शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

अंगणवाडीत पोषण आहार बंद

By admin | Updated: December 9, 2015 00:58 IST

तालुक्यातील अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ हजार विद्यार्थी या

वैभव गायकर,  पनवेलतालुक्यातील अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ हजार विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पोषण आहार मिळत नसल्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थीसंख्येतही घट होत आहे. त्यामुळे कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पनवेल तालुक्यात ३२५ अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या येतात. ३ ते ६ वयोगटातील बालकांना सकस व पोषक आहार मिळावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पनवेलमधील अंगणवाड्यांमध्ये दोन महिन्यांपासून पोषण आहार न मिळाल्याने १८,८९५ मुलांना खाऊ वाटप झालेले नाही. यापूर्वी खाऊ वाटपाचे काम स्थानिक बचत गटांना देण्यात आले होते. मात्र ते अचानक बंद करून पुणे येथील जननी महिला मंडळाला देण्यात आल्याचे समजते. त्यांनी आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत अंगणवाड्यांना शालेय पोषण आहार पुरविला. मात्र आॅक्टोबर २०१५ पासून पोषण आहार न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप बंद झाले आहे. वारंवार मागणी करूनही बालकांना पोषण आहार मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.पनवेल तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये प्रकल्प १ आणि प्रकल्प २ असे मिळून जवळपास १८ हजारांहून अधिक बालके अंगणवाड्यांमध्ये येतात. त्यातील मध्यम कुपोषित असलेल्या मुलांची संख्या ९७२ हून अधिक, तर अतिकुपोषित विद्यार्थ्यांची संख्या १४३ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोषण आहार मिळत नसल्यामुळे कुपोषित मुलांची संख्या वाढत चालली असल्याचे निदर्शनास येत आहे.