शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

हिवाळ्यामुळे ग्राहकांची बाजरीला पसंती; मुंबईत प्रतिदिन ५० ते ९० टन विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:26 IST

घरासह हॉटेलमध्येही बाजरीच्या वस्तूंना मागणी वाढली

नामदेव मोरे 

नवी मुंबई : हिवाळा सुरू होताच मुंबई बाजार समितीमध्ये बाजरीची आवक जवळपास दुप्पट होऊ लागली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ५० ते ९० टन विक्री होत आहे. घरासह हॉटेलमधूनही बाजरीच्या वस्तूंना ग्राहकांकडून पसंती मिळू लागली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागृती वाढू लागली आहे. यामुळे वातावरणातील बदलाप्रमाणे आहारामध्येही बदल केला जात आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून बाजरीच्या मागणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. सप्टेंबरमध्ये मुंबई बाजार समितीमध्ये सरासरी ३० ते ४० टन बाजरीची आवक होऊ लागली होती. सद्यस्थितीमध्ये ही आवक वाढून ५० ते ९० टन एवढी झाली आहे. बलवर्धक धान्य म्हणून याची ओळख असून त्यामध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशीयम, कॉपर, व्हिटॅमीन ईचे प्रमाण जास्त असते. यामुळे हिवाळ्यात बाजरीच्या वस्तूंना पसंती दिली जाते. सद्यस्थितीमध्ये घरांमध्ये व हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीची मागणी वाढली आहे. याशिवाय थालीपीठ, वडी व इतर वस्तूही केल्या जात आहेत.

देशात सर्वाधिक बाजरीचे उत्पादन राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरयाणा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रामध्ये होत आहे. देशभरातून बाजरी विक्रीसाठी मुंबई बाजार समितीमध्ये येत आहे. राज्यातील सर्वात जास्त विक्री मुंबईमध्येच होत असून त्यानंतर जालना व इतर बाजार समित्यांमध्येहीआवक वाढू लागली आहे. गतवर्षी घाऊक बाजारपेठेमध्ये १८ ते २६ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. यावर्षी बाजारभाव प्रतिकिलो २६ ते ३२ रुपये झाले असल्याची माहिती बाजार समितीमधील व्यापारी व अधिकाऱ्यांनी दिली. मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवरही मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.पुढील कारणांसाठी बाजरीला दिली जाते पसंतीबाजरी उष्णतावर्धक असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ऊर्जास्रोत ठरत आहे. बाजरीच्या पदार्थांमुळे खूप वेळेपर्यंत भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. यामध्ये मेग्नॅशीयम व पोटॅशीयम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बाजरीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.