शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्त्यावरील भंगार वाहनांचा स्वच्छ भारत अभियानात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:06 IST

पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे.

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे. मुख्य व अंतर्गत रोडवर शेकडो भंगार वाहने धूळखात पडली असून त्यांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला पडला आहे.भंगार वाहनांची सर्वात गंभीर समस्या पनवेल परिसरामध्ये आहे. प्रत्येक रोडवर व गल्लीमध्ये वापरात नसलेली वाहने उभी करण्यात आली आहेत. काही ठिकाणी एक वर्षापेक्षा जास्त काळ भंगार वाहने उभी असून ती सडू लागली आहेत. नादुरुस्त वाहनांकडे मालक फिरत नाहीत व त्यांची विल्हेवाट लावण्याची काहीही यंत्रणा महानगरपालिकेकडे नाही. पनवेल पालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी व्यवस्थित यंत्रणा उभारता आलेली नाही अशा स्थितीमध्ये भंगार कोणी उचलयाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालय, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली,एमआयडीसी व इतर ठिकाणीही मोठ्याप्रमाणात रोडवर वाहनांचे सांगाडे उभे आहेत. अद्याप पालिकेने त्याचे सर्वेक्षणही केलेले नाही. यामुळे साफसफाई करण्यामध्ये अडथळे निर्माण होवू लागले आहेत. नागरिकांनी रोडवर एखादे वाहन उभे केले की वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत. पण भंगार गाड्या उचलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने व पोलिसांनी भंगार वाहनांचा लिलाव करावा अशी मागणीही केली जात आहे. उरण परिसरामध्येही ही समस्या गंभीर होवू लागली आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी शहरातील भंगार वाहनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश परिमंडळ एक व दोन मधील अधिकाऱ्यांना दिले होते. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व बेवारस वाहनांवर नोटीस लावण्यात आल्या व ती उचलून रबाळेमधील एनएमएमटी डेपोच्या जागेवर जावून उभी केली आहेत. परंतु हे भंगार ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागल्यामुळे पालिकेने सद्यस्थितीमध्येही मोहीम थांबविली आहे.>सर्वेक्षणाची गरजमहानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी शहरातील भंगार वाहनांचे संयुक्तपणे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. गाडी मालक कित्येक महिने स्वत:च्या वाहनांकडे फिरकत नाहीत व एका जागेवरून हलवतही नाहीत. अशा वाहनांचा लिलाव करून रोडवरील कचरा दूर करावा अशी मागणी होवू लागली आहे.

टॅग्स :carकार