शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

रस्त्यावरील भंगार वाहनांचा स्वच्छ भारत अभियानात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:06 IST

पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे.

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे. मुख्य व अंतर्गत रोडवर शेकडो भंगार वाहने धूळखात पडली असून त्यांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला पडला आहे.भंगार वाहनांची सर्वात गंभीर समस्या पनवेल परिसरामध्ये आहे. प्रत्येक रोडवर व गल्लीमध्ये वापरात नसलेली वाहने उभी करण्यात आली आहेत. काही ठिकाणी एक वर्षापेक्षा जास्त काळ भंगार वाहने उभी असून ती सडू लागली आहेत. नादुरुस्त वाहनांकडे मालक फिरत नाहीत व त्यांची विल्हेवाट लावण्याची काहीही यंत्रणा महानगरपालिकेकडे नाही. पनवेल पालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी व्यवस्थित यंत्रणा उभारता आलेली नाही अशा स्थितीमध्ये भंगार कोणी उचलयाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालय, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली,एमआयडीसी व इतर ठिकाणीही मोठ्याप्रमाणात रोडवर वाहनांचे सांगाडे उभे आहेत. अद्याप पालिकेने त्याचे सर्वेक्षणही केलेले नाही. यामुळे साफसफाई करण्यामध्ये अडथळे निर्माण होवू लागले आहेत. नागरिकांनी रोडवर एखादे वाहन उभे केले की वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत. पण भंगार गाड्या उचलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने व पोलिसांनी भंगार वाहनांचा लिलाव करावा अशी मागणीही केली जात आहे. उरण परिसरामध्येही ही समस्या गंभीर होवू लागली आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी शहरातील भंगार वाहनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश परिमंडळ एक व दोन मधील अधिकाऱ्यांना दिले होते. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व बेवारस वाहनांवर नोटीस लावण्यात आल्या व ती उचलून रबाळेमधील एनएमएमटी डेपोच्या जागेवर जावून उभी केली आहेत. परंतु हे भंगार ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागल्यामुळे पालिकेने सद्यस्थितीमध्येही मोहीम थांबविली आहे.>सर्वेक्षणाची गरजमहानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी शहरातील भंगार वाहनांचे संयुक्तपणे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. गाडी मालक कित्येक महिने स्वत:च्या वाहनांकडे फिरकत नाहीत व एका जागेवरून हलवतही नाहीत. अशा वाहनांचा लिलाव करून रोडवरील कचरा दूर करावा अशी मागणी होवू लागली आहे.

टॅग्स :carकार