शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

By admin | Updated: October 3, 2015 02:34 IST

‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी

नवी मुंबई : ‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी हातात झाडू घेऊन शाळेबाहेरील सर्व परिसराची स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाशीतील सेक्टर १६ येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी या विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, यासाठी शाळेच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. नवी मुंबई शहराला मानाचा तुरा मिळवून देणाऱ्या स्मार्ट शहराचे मानांकन आणखीन उंचाविण्यासाठी शहर स्वच्छ असणे अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा केनेडी यांनी केले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे आणि त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे केनेडी यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवृंद, कर्मचारीही मोहिमेत सहभागी होते. सामूहिक शपथ पनवेल : गांधी जयंतीनिमित्ताने पनवेल नगरपरिषदेने शहरात स्वच्छता रॅली काढली. रॅलीत काही विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचा पेहराव परिधान केला होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी सामूहिक शपथ घेवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे सांगितले. काही तरु णांनी पथनाट्य देखील सादर केले.