शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली सर्कलच्या अंडरपास कामामुळे वाहनकोंडीत अडकले बारावीचे विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:35 IST

कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे.

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कळंबोली सर्कल येथील अंडरपासचे काम करण्यासाठी मंगळवारपासून मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग बंद करण्यात येणार होता. त्यामुळे सकाळपासून अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळपासून सुरू झालेल्या वाहतूक कोंडीत  बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी अडकल्याने पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.  

इयत्ता बारावीच्या परीक्षेला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तळोजा येथील विद्यार्थी परीक्षा सेंटरवर उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली.  कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. त्यानुसार अंडरपास कामासाठी मंगळवारपासून मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग बंद करणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

अर्धा तास परीक्षार्थी वाहतूककोंडीतपहाटेपासूनच अवजड वाहनांची मुंब्रा-जेएनपीटी महामार्गावर गर्दी झाली होती. याचा फटका बारावीच्या परीक्षार्थ्यांना बसला. कळंबोली सर्कल ते मुंब्रा महामार्गावर एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तळोजा परिसरातून पनवेल येथे येण्यासाठी अर्धा तास शाळकरी मुले, परीक्षार्थी वाहतूक कोंडीत अडकले होते. 

महामार्ग बंद झालाच नाही मंगळवारपासून सहा महिन्यांकरिता कळंबोली सर्कल येथे  मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग अंडरपास कामासाठी बंद करण्यात येणार होता. मात्र, नियोजन नसल्याने महामार्ग बंद करण्यात आला नाही. कल्याण, ठाणे, नवी मुंबई परिसरातील वाहनधारकांना मंगळवारपासून महामार्ग बंद होणार असल्याने सकाळचे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी