शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कळंबोली सर्कलच्या अंडरपास कामामुळे वाहनकोंडीत अडकले बारावीचे विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:35 IST

कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे.

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कळंबोली सर्कल येथील अंडरपासचे काम करण्यासाठी मंगळवारपासून मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग बंद करण्यात येणार होता. त्यामुळे सकाळपासून अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळपासून सुरू झालेल्या वाहतूक कोंडीत  बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी अडकल्याने पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.  

इयत्ता बारावीच्या परीक्षेला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तळोजा येथील विद्यार्थी परीक्षा सेंटरवर उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली.  कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. त्यानुसार अंडरपास कामासाठी मंगळवारपासून मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग बंद करणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

अर्धा तास परीक्षार्थी वाहतूककोंडीतपहाटेपासूनच अवजड वाहनांची मुंब्रा-जेएनपीटी महामार्गावर गर्दी झाली होती. याचा फटका बारावीच्या परीक्षार्थ्यांना बसला. कळंबोली सर्कल ते मुंब्रा महामार्गावर एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तळोजा परिसरातून पनवेल येथे येण्यासाठी अर्धा तास शाळकरी मुले, परीक्षार्थी वाहतूक कोंडीत अडकले होते. 

महामार्ग बंद झालाच नाही मंगळवारपासून सहा महिन्यांकरिता कळंबोली सर्कल येथे  मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग अंडरपास कामासाठी बंद करण्यात येणार होता. मात्र, नियोजन नसल्याने महामार्ग बंद करण्यात आला नाही. कल्याण, ठाणे, नवी मुंबई परिसरातील वाहनधारकांना मंगळवारपासून महामार्ग बंद होणार असल्याने सकाळचे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी