शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

शहरात गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर धाडसत्र

By admin | Updated: July 30, 2016 04:40 IST

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये नेरूळ, तुर्भे नाका, इंदिरानगर, एपीएमसी, कोपरखैरणे, वाशी परिसरामध्ये दुकाने सुरू केली आहेत. ‘लोकमत’च्या टीमने

नवी मुंबई : अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये नेरूळ, तुर्भे नाका, इंदिरानगर, एपीएमसी, कोपरखैरणे, वाशी परिसरामध्ये दुकाने सुरू केली आहेत. ‘लोकमत’च्या टीमने या अड्ड्यांवर खुलेआम गांजा विकला जात असल्याचे उघडकीस आणताच अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी एपीएमसीजवळ धाड टाकून गांजाची झाडे ताब्यात घेतली आहेत. या रोपांची लागवड करणाऱ्या पप्पू साजीद खानला अटक केली. एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांनी तेथून पळ काढला असून तेथील विक्री बंद झाली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये यापूर्वी गांजा विक्री करणारी पानटपरी तेथून हलविण्यात आली आहे. पोलिसांनी यापूर्वी गांजा विकणाऱ्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेवून चौकशी केली असता एपीएमसीमधील राजू नावाची व्यक्ती तेथे गांजा विकत असल्याचे तपासात पुढे आले आहे. नेरूळ सेक्टर २४ मध्ये बालाजी टेकडीच्या पायथ्याशी गांजा विक्रीचा मोठा अड्डा होता. महाविद्यालयीन तरुण येथून गांजा खरेदी करत होते. पोलिसांनी पहाटेच या झोपडीवर धाड टाकली. येथे गांजा विक्री करणारी महिला शोभा मोहन गोपीला अटक करून २३० ग्रॅम गांजा जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. शहरात इतरही ठिकाणी कुठे गांजा किंवा इतर अमली पदार्थांची विक्री होत आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शहरात खळबळ खुलेआम सुरू असलेल्या गांजा विक्रीचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून दोघांना अटक करून नेरूळ व एपीएमसीमध्ये गुन्हे दाखल केले. याठिकाणची गांजाची रोपे व २३० ग्रॅम गांजाही जप्त केला असून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे. ‘लोकमत’चे मानले आभार नेरूळमध्ये नागरी वस्तीमध्ये गांजा विक्री होत होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गांजा घेण्यासाठी येथे तरुण येत होते. वारंवार भांडणे होत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी धाड टाकून हा अड्डा बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.