शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:50 IST

नवी मुंबई : देशातील ४०४१ शहरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. नवी मुंबईने यामध्ये आघाडी घेतली असून अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे

नवी मुंबई : देशातील ४०४१ शहरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. नवी मुंबईने यामध्ये आघाडी घेतली असून अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. माझा कचरा माझी जबाबदारी व माझी नवी मुंबई माझा अभिमान ही घोषवाक्ये घेऊन स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविला जात आहे. नवी मुंबईला सुपर स्मार्ट सिटी बनविण्याचे व देशात अव्वल क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविणारे मनपा आयुक्त रामास्वामी एन. यांनी लोकमत कॉफी टेबलमध्ये स्वच्छतेच्या चळवळीविषयी सविस्तर भूमिका व्यक्त केली.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान २०१७ मध्ये नवी मुंबईला देशात आठवा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. शहरामध्ये पायाभूत सुविधा उत्तम आहेत. अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड, पाणीपुरवठा योजना, शहर स्वच्छता या सर्वच गोष्टींमध्ये आपण आघाडीवर होतो. काही प्रमाणात उणीव राहिली ती लोकसहभागामध्ये. गतवर्षीच्या त्रुटी दूर करून स्वच्छता अभियान २०१८ साठी महापालिका सज्ज झाली आहे. गतवर्षी देशातील ४३१ शहरांनी सहभाग घेतला होता. या वर्षी तब्बल ४०४१ शहरांनी सहभाग नोंदविला आहे. नवी मुंबईच देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला हे अभियान आपले वाटले पाहिजे. स्वच्छतेची चळवळ सुरू झाली पाहिजे. यासाठीच माझा कचरा माझी जबाबदारी व माझे शहर माझा अभिमान ही दोन घोषवाक्ये तयार केली आहेत. आपल्या शहराचा बहुमान वाढविण्यासाठी व देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही. प्रत्येक नागरिकाला ही वैयक्तिक जबाबदारी वाटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाने ओला व सुका कचरा वेगळा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ७५ टक्के कचºयाचे वर्गीकरण होऊ लागले आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी कचरा वर्गीकरणाबरोबर त्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.शहरातील रस्ते, भिंती, उड्डाणपूल, सार्वजनिक प्रसाधानगृह कुठेही पाहिले तरी स्वच्छतेच्या चळवळीचीच माहिती मिळाली पाहिजे यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. भिंती रंगवल्या जात आहेत. त्यावर स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे संदेश रेखाटण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या भिंतींवरही जाहिराती करण्यात येणार आहेत. रेल्वे स्टेशन व परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनीही या चळवळीमध्ये योगदान देण्यास सुरुवात केली असून नवी मुंबई देशातील पहिली सुपर स्मार्ट सिटी होईल, असा विश्वास रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला आहे.>लोकसहभाग महत्त्वाचास्वच्छता अभियानामध्ये गतवर्षी लोकसहभागामध्ये नवी मुंबई मागे राहिली. ही उणीव दूर करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्यात आले आहे. लोकसहभाग वाढू लागला आहे. शहरवासीयांनी आपल्या घरातील कचºयाचे वर्गीकरण करावे. स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी व्हावे. कचरा व अस्वच्छता दिसल्यास त्याची माहिती प्रशासनास द्यावी. केंद्राचे पथक शहरात आल्यानंतर त्यांनी अभियानाविषयी माहिती विचारल्यास ती देता आली पाहिजे. नागरिकांनी सहभाग घेतल्यास नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आल्याशिवाय राहणार नाही.>७५ टक्केकचरा वर्गीकरणकचरा वर्गीकरणामध्येही नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. ७५ टक्के कचºयावर वर्गीकरण केले जात आहे. डम्पिंग ग्राउंडवरही ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जात आहे. प्लॅस्टिक वेगळे केले जात आहे. ज्या कचºयावर प्रक्रिया केली जात नाही तोच डम्पिंगमध्ये टाकला जात आहे. रामनगर झोपडपट्टीमध्ये ८५ टक्के कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. अनेक मोठ्या गृहनिर्माण सोसायटी व हॉटेल चालकांनीही कचºयावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.>विद्यार्थ्यांचाही सहभाग : शहरातील प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता अभियानाची माहिती दिली जात आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत बनवून त्यांना त्यांच्या घरामध्ये कचरा वर्गीकरण करावे, असे आवाहन केले जात आहे. त्यांना माहितीपत्रक देऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले जात असून यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.>शाळा व उद्यानांमध्ये प्रकल्पमहापालिकेने कचºयावर प्रक्रिया करण्याची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. प्रत्येक उद्यानामध्ये व महापालिकेच्या शाळेमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारा छोटा प्रकल्प सुरू केला आहे. शाळा व उद्यानातील कचरा बाहेर टाकला जाणार नाही. त्यापासून खतनिर्मिती करून त्याचा वापर उद्यानासाठीच केला जात आहे. शहरातील हॉटेल, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनाही यासाठी आवाहन केले आहे.>प्रत्येक प्रभागात जनजागृतीशहरातील सर्व प्रभागांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष वाहन तयार केले आहे. एलईडी स्क्रीन तयार केली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाची माहिती दिली जाणार आहे. स्थानिक नगरसेवकांचे संदेशही या वेळी एलईडी स्क्रीनवर दाखविला जाणार असून नागरिकांना या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.>स्वच्छता अ‍ॅपचा वापर करावामहापालिकेने स्वच्छता अ‍ॅप सुरू केले आहे. प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करावे. शहरात कुठेही कचरा दिसल्यास त्याचे फोटो काढून अ‍ॅपवर टाकावे. चोवीस तासांमध्ये कचरा साफ करून तेथील फोटो टाकले जातील. यावर नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविणे आवश्यक असून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई