शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

शहराचे प्रवेशद्वार केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:04 IST

नागरिकांना प्रतीक्षा : २० वर्षांपासून फक्त अर्थसंकल्पात तरतूद

योगेश पिंगळे।

नवी मुंबई : २१ व्या शतकातील शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत आणि आभार मानण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी पालिकेमार्फत शहरातील पाच ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत; या कामासाठी मागील सुमारे २० वर्षांपासून अर्थसंकल्पातच निधीची तरतूद करण्यात येत असून प्रत्यक्षात कृतीकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील नागरिकांनाही प्रवेद्वारांची प्रतीक्षा असून अर्थसंकल्पीय चर्चेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनादेखील या कामाचा विसर पडत आहे.

नवी मुंबई शहराकडे एक नियोजनबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून पाहिले जाते. शहरात सिडकोच्या नियोजनबद्ध शहर मांडणीनंतर महापालिकेच्या माध्यमातून शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे शहराचा नावलौकिक देशातच नाही तर देशाबाहेरदेखील झाला आहे. या नियोजनबद्ध शहरात देशाबाहेरील तसेच देशातील विविध राज्यांतील नागरिक विविध उपक्र मांची पाहणी करण्यासाठी येतात. नवी मुंबई शहरात असलेली विविध शासकीय कार्यालये, एमआयडीसीतील विविध कंपन्या, महाविद्यालये, शाळा, आयटी कंपन्या, मॉल, उद्याने आदी ठिकाणी हजारो नागरिक ये-जा करतात. शहरातून मुंबई, पुणे, ठाणे आदी भागात जाणारे महामार्ग असल्याने शहरातून प्रवास करणाºया नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या नागरिकांना शहराची हद्द माहीत व्हावी, शहराच्या सुशोभीकरणात भर पडावी, शहराचे वेगळेपण अधोरेखित व्हावे आणि शहरातून प्रवेश करणाºया नागरिकांचे स्वागत आणि आभार मानण्यासाठी प्रवेशद्वार उभारण्यात येणार होते.शहरातील सीबीडी-बेलापूर, वाशी, ऐरोली, दिघा, शिळफाटा या भागात प्रवेशद्वार उभारण्यासाठी २००० पासून पालिकेच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूददेखील करण्यात येत आहे. दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रवेशद्वार उभारणीच्या कामासाठी लागणाºया निधीत वाढदेखील करण्यात येत आहे; परंतु प्रवेशद्वार उभारणीकडे प्रत्यक्षात दुर्लक्ष झाले आहे. नवी मुंबई शहर स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींवर उभे राहिलेले शहर आहे.प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसलेल्या शहरात स्थानिक भूमिपुत्रांच्या गावांची ओळख राहावी, यासाठी गावांच्या सीमा हद्दीवरही प्रवेशद्वार उभारणार असल्याच्या घोषणा लोकप्रतिनिधींद्वारे निवडणुकींच्या वचननाम्यात करण्यात आल्या आहेत; परंतु महापालिकेची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण होऊनदेखील शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच अनेक गावांच्या सीमाहद्दीवर प्रवेशद्वार बनले नसून लोकप्रतिनिधींच्या घोषणादेखील हवेतच विरल्या आहेत. दरवर्षी पालिका अर्थसंकल्पात चर्चा करताना प्रवेशद्वार या विषयावर लोकप्रतिनिधी आपली मते मांडतात; परंतु अर्थसंकल्पीय चर्चेनंतर गावांच्या आणि शहराच्या प्रवेशद्वारांकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शनिवार, १६ फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाने स्थायी समिती सभेत २०१९-२० या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला असून, या अर्थसंकल्पातदेखील ४.४६ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु या वर्षी तरी शहरांना आणि गावांना प्रवेशद्वार मिळणार का? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला पडला असून, नागरिक प्रवेशद्वारांच्या प्रतीक्षेत आहेत.शहरात प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे, यासाठी डिझाइन तयार करण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच प्रवेशद्वाराची कामे मार्गी लागतील.- डॉ. रामास्वामी एन., पालिका आयुक्तकुकशेत गावाच्या धर्तीवर हवे प्रवेशद्वारच्नेरु ळ एमआयडीसी क्षेत्रातील हार्डिलिया कंपनीमुळे कुकशेत गाव विस्थापित करून नेरुळ सेक्टर - १४ येथे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.च्या स्थलांतरित झालेल्या गावाच्या हद्दीवर प्रवेशद्वाराच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत, त्यामुळे या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.च्याच धर्तीवर शहरातील सर्वच गावांना महापालिकेच्या माध्यमातून प्रवेशद्वार मिळावे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई