शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

शहराचे प्रवेशद्वार केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:04 IST

नागरिकांना प्रतीक्षा : २० वर्षांपासून फक्त अर्थसंकल्पात तरतूद

योगेश पिंगळे।

नवी मुंबई : २१ व्या शतकातील शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत आणि आभार मानण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी पालिकेमार्फत शहरातील पाच ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत; या कामासाठी मागील सुमारे २० वर्षांपासून अर्थसंकल्पातच निधीची तरतूद करण्यात येत असून प्रत्यक्षात कृतीकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील नागरिकांनाही प्रवेद्वारांची प्रतीक्षा असून अर्थसंकल्पीय चर्चेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनादेखील या कामाचा विसर पडत आहे.

नवी मुंबई शहराकडे एक नियोजनबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून पाहिले जाते. शहरात सिडकोच्या नियोजनबद्ध शहर मांडणीनंतर महापालिकेच्या माध्यमातून शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे शहराचा नावलौकिक देशातच नाही तर देशाबाहेरदेखील झाला आहे. या नियोजनबद्ध शहरात देशाबाहेरील तसेच देशातील विविध राज्यांतील नागरिक विविध उपक्र मांची पाहणी करण्यासाठी येतात. नवी मुंबई शहरात असलेली विविध शासकीय कार्यालये, एमआयडीसीतील विविध कंपन्या, महाविद्यालये, शाळा, आयटी कंपन्या, मॉल, उद्याने आदी ठिकाणी हजारो नागरिक ये-जा करतात. शहरातून मुंबई, पुणे, ठाणे आदी भागात जाणारे महामार्ग असल्याने शहरातून प्रवास करणाºया नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या नागरिकांना शहराची हद्द माहीत व्हावी, शहराच्या सुशोभीकरणात भर पडावी, शहराचे वेगळेपण अधोरेखित व्हावे आणि शहरातून प्रवेश करणाºया नागरिकांचे स्वागत आणि आभार मानण्यासाठी प्रवेशद्वार उभारण्यात येणार होते.शहरातील सीबीडी-बेलापूर, वाशी, ऐरोली, दिघा, शिळफाटा या भागात प्रवेशद्वार उभारण्यासाठी २००० पासून पालिकेच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूददेखील करण्यात येत आहे. दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रवेशद्वार उभारणीच्या कामासाठी लागणाºया निधीत वाढदेखील करण्यात येत आहे; परंतु प्रवेशद्वार उभारणीकडे प्रत्यक्षात दुर्लक्ष झाले आहे. नवी मुंबई शहर स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींवर उभे राहिलेले शहर आहे.प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसलेल्या शहरात स्थानिक भूमिपुत्रांच्या गावांची ओळख राहावी, यासाठी गावांच्या सीमा हद्दीवरही प्रवेशद्वार उभारणार असल्याच्या घोषणा लोकप्रतिनिधींद्वारे निवडणुकींच्या वचननाम्यात करण्यात आल्या आहेत; परंतु महापालिकेची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण होऊनदेखील शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच अनेक गावांच्या सीमाहद्दीवर प्रवेशद्वार बनले नसून लोकप्रतिनिधींच्या घोषणादेखील हवेतच विरल्या आहेत. दरवर्षी पालिका अर्थसंकल्पात चर्चा करताना प्रवेशद्वार या विषयावर लोकप्रतिनिधी आपली मते मांडतात; परंतु अर्थसंकल्पीय चर्चेनंतर गावांच्या आणि शहराच्या प्रवेशद्वारांकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शनिवार, १६ फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाने स्थायी समिती सभेत २०१९-२० या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला असून, या अर्थसंकल्पातदेखील ४.४६ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु या वर्षी तरी शहरांना आणि गावांना प्रवेशद्वार मिळणार का? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला पडला असून, नागरिक प्रवेशद्वारांच्या प्रतीक्षेत आहेत.शहरात प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे, यासाठी डिझाइन तयार करण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच प्रवेशद्वाराची कामे मार्गी लागतील.- डॉ. रामास्वामी एन., पालिका आयुक्तकुकशेत गावाच्या धर्तीवर हवे प्रवेशद्वारच्नेरु ळ एमआयडीसी क्षेत्रातील हार्डिलिया कंपनीमुळे कुकशेत गाव विस्थापित करून नेरुळ सेक्टर - १४ येथे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.च्या स्थलांतरित झालेल्या गावाच्या हद्दीवर प्रवेशद्वाराच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत, त्यामुळे या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.च्याच धर्तीवर शहरातील सर्वच गावांना महापालिकेच्या माध्यमातून प्रवेशद्वार मिळावे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई