शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पहाटे सहा वाजल्यापासूच नवी मुंबईत शहर स्वच्छता; आयुक्तांचे प्रशासनास निर्देश

By नामदेव मोरे | Updated: May 3, 2024 19:41 IST

स्वच्छतेमधील हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशारा.

नवी मुंबई:  स्वच्छता अभियानातील मानांकन उंचाविण्यासाठी पहाटे सहा पासून शहर स्वच्छतेला सुरूवात करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. शुक्रवारी पहाटे बेलापूर विभागाला अचान भेट देवून कामांची पाहणी केली. दिवसा संपूर्ण शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेवून स्वच्छता आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

स्वच्छता ही नवी मुंबई शहराची ओळख असून ती कायम टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. ८ विभाग कार्यालयांसाठी ८ नोडल अधिकारी नेमले असून त्या माध्यमातून प्रत्येक विभागाचे परीक्षण केले जात आहे. शहर स्वच्छतेचे काम सकाळी सहा वाजता सुरू करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी बेलापूर विभागाची पाहणी केली. ठरलेल्या वेळेत कामे झाली पाहिजेत. कोणत्याही स्थितीमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यालयात सर्व विभागांमधील कामांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. कचरा वर्गीकरणाची सुरुवात प्रत्येक घरापासूनच झाली पाहिजे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेगळा करावा लागू नये. कचरा संकलनासाठी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करून विभागनिहाय आराखडा आठ दिवसांत तयार करण्यास सांगितले.रिक्षा स्टँड, मार्केटमध्ये मुताऱ्या उपलब्ध करा. शहरातील रेड व यलो स्पॉटची पाहणी करण्यात यावी. रिक्षा, टॅक्सी स्टँड, मार्केटच्या ठिकाणी मुताऱ्या उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केल्या. प्रत्येक शाळा, परिसर व तेथील शौचालय स्वच्छ असलेच पाहिजे. पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर नियमित कारवाई करण्यास सांगितले. हवा प्रदूषण रोखण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. बांधकामाचा कचरा रोडवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक विभागात वॉटर फॉगिंग व डिप क्लिनिंगवर भर देण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह सर्व विभाग अधिकारी उपस्थित होते. नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारस्वच्छ सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविते. थ्री आर सेंटर्स, थ्री आर ऑन व्हिल्स, फिशफेड, ड्रायवेस्ट बँक, ग्रीनसोल असे उपक्रम राबविले जात आहेत. ते अधिक गतिमान करून झिरो वेस्ट स्लम मॉडेलची व्याप्ती वाढवावी, अशा सूचनाही केल्या. नागरिकांचा सहभाग वाढविणारस्वच्छता सर्वेक्षणात यश मिळविण्यामध्ये नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी भर देण्यात येणार आहे. माझे शहर स्वच्छ राखण्यात मी १०० टक्के योगदान देईल ही भावना नागरिकांमध्ये वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई