शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पाणीटंचाईवर नागरिकांच्या सूचना

By admin | Updated: February 5, 2016 02:52 IST

नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर विचारविनिमय करण्यासाठी पनवेल नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत

पनवेल : नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर विचारविनिमय करण्यासाठी पनवेल नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पनवेलकरांनी विविध उपाययोजना सुचविल्या. त्याचबरोबर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सांगोपांग चर्चा पाणी परिषदेत करण्यात आली. नागरिकांच्या सूचना विचारात घेण्यात येतील अशी ग्वाही पालिकेच्या वतीने देण्यात आली.नगराध्यक्षा चारूशीला घरत, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, मुख्याधिकारी मंगेश चितळे, उपनगराध्यक्ष मदन कोळी आदी उपस्थित होते. सध्या वितरीत होत असलेले पाणी नागरिकांनी जपून वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी आतापर्यंत सात बैठका झाल्या असून पाण्याचे न्याय्य वाटप करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.मुख्याधिकारी मंगेश चितळे म्हणाले की, पनवेल शहराला प्रतिदिन देहरंग धरणातून ११ एमएलडी, एमजेपी कडून ९ एमएलडी, एमआयडीसी कडून ७ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र जुन्या पाइपलाइनमुळे पाइप लाइन फुटते त्या दुरूस्तीसाठी शटडाउन घेतला जातो. त्यामुळे शहराच्या काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. धरणात पाणी मुळातच पाणी कमी असून १३१ दिवस पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. त्यासाठी पाणी जपून वापरणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्याकरिता पालिकेने नियोजन केले असून एसटीपी प्लॅन्ट सुरू केला आहे. हे प्रक्रि यायुक्त पाणी वापरास उपयोगात आणले तर पाण्याची मोठी बचत होईल. हा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी योजनांमध्ये अमृत योजनेअंतर्गत कोटी रूपये निधी मंजूर झाला असल्याचे चितळे यांनी सांगितले. तात्पुरत्या योजनेत जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविणे, विहिरीचा वापर, टँकर फिलिंग सेंटर, एसटीपी प्लॅन्टच्या पाण्याचा वापर असे उपाय योजण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पाणीटंचाईसंबंधी आयोजित या परिषदेत पंढरीनाथ दळवी, रोहिणी लिमये, अरु ण भिसे , लक्ष्मी बातम व इतर अनेक नागरिकांनी सूचना केल्या. (वार्ताहर)