शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

नागरिकांनी घेतली भटक्या कुत्र्यांची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:16 IST

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्याने चालताना अचानक अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांची पादचाºयांनी धास्ती घेतली आहे.

नवी मुंबई : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्याने चालताना अचानक अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांची पादचाºयांनी धास्ती घेतली आहे. मागील तीन महिन्यात कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या सुमारे जवळपास शंभर घटना घडल्या आहेत. त्यामुळे जनमानसात भटक्या कुत्र्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या टोळीचा धसका दुचाकीस्वारांनी घेतला आहे. एकूणच या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेच्या संबंधित यंत्रणेला सपशेल अपयश आल्याचे दिसून आले आहे.गाव-गावठाणांसह शहरी भागातही भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी तर या कुत्र्यांमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेच्या श्वान नियंत्रण पथकाने दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर या आठ विभागात एप्रिल २0१७ ते मार्च २0१८ या कालावधीत नवी मुंबईच्या विविध भागातून ४१६३ कुत्री पकडली. त्यापैकी ३२२४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली, तर उर्वरित जखमी आणि रोगट कुत्र्यांवर उपचार करून सोडून देण्यात आले.मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांचा चावा घेतला आहे. विशेष म्हणजे कुत्रे चावल्यानंतर त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णांना धावपळ करावी लागते. कारण महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस नसल्याने रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा अधार घ्यावा लागतो आहे. महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचाराची सुविधा असली तरी दिघा किंवा एमआयडीसी परिसरातील रुग्णांना तेथपर्यंत जाणे गैरसोयीचे वाटते. त्यामुळे खासगी रुग्णालयाशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहत नाही. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याप्रकाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. रात्रभर गोंगाट करणाºया कुत्र्यांची टोळकी तसेच चावºया कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.