शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:56 IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत.

- वैभव गायकर ।पनवेल : महानगरपालिका क्षेत्रात १४ ते २४ जुलैदरम्यान दहा दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता, परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होत नसेल, तर कशाला हवा आहे, अशी प्रतिक्रिया पनवेलकरांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना दिसत आहेत.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कायम राहिले, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे घरभाडे व इतर खर्च सुरू असताना किती दिवस घरी बसणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. व्यापारी वर्गही कमालीचा हैराण झाला आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची गरज होती, असे मत होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मीरानी यांनी व्यक्त केले आहे. सर्वच जण आपल्या घरी अन्नधान्याचा साठा करतात, असा प्रकार नाही. हातावर पोट असणारे अनेक जण रोज सामान भरत असतात. अशा नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे मीरानी म्हणाले. कोविडच्या काळात कर्मचाºयांचा तुटवडा भासत असताना आम्ही घरपोच सामान देऊ शकत नाही. प्रशासनाने सामान लोडिंग अनलोडिंगला परवानगी देणे गरजेचे आहे. त्यातच लॉकडाऊन वाढविताना नागरिक, तसेच व्यापारी वर्गाला पुन्हा एकदा ठरावीक वेळ देण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नसल्याने पुन्हा एकदा जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे मीरानी यांचे म्हणणे आहे. दि होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशन व पनवेल व्यापारी संघटना (किरकोळ) या दोन्ही संघटनांमध्ये रिटेल व खाद्यपदार्थांसह इतर व्यवसाय करणाºया ३५० ते ४०० व्यापाºयांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांची, तसेच व्यापाºयांची गैरसोय होणार नाही, याबाबत पालिके ने विचार करणे गरजेचे असल्याचे मीरानी म्हणाले.लोकप्रतिनिधींनीही या लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही. लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नसल्याचे केणी यांनी स्पष्ट केले.भाज्या खरेदीसाठी धावाधाव : गर्दी टाळण्यासाठी पालिकेने काउंटर विक्री बंद केली असली, तरी अनेक जण भाज्या, फळांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी उघड्यावर विक्रीला बंदी असल्याने पोलीस अथवा पालिका कर्मचारी येताच, फेरीवाल्यांसह नागरिकांची मोठी धावाधाव होत आहे.सोशल मीडियावर नेटकºयांचा उद्रेकदहा दिवसांनी लॉकडाऊन वाढवल्याचे कळताच सोशल मीडियावर या लॉकडाऊनच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, नोकºया गेल्या, अनेकांना रोजगाराचा प्रश्न सतावत आहे. नव्याने सुरुवात करण्यासाठी लॉकडाऊन शिथिलता होेण्याची गरज असल्याचे नागारिकांचे म्हणणे आहे.महापालिकेचे नागरिकांना अवाहनकोरोनाच्या नियंत्रणासाठी पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे अवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढले असले, तरी मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली नसल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :panvelपनवेल