शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:56 IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत.

- वैभव गायकर ।पनवेल : महानगरपालिका क्षेत्रात १४ ते २४ जुलैदरम्यान दहा दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता, परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होत नसेल, तर कशाला हवा आहे, अशी प्रतिक्रिया पनवेलकरांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना दिसत आहेत.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कायम राहिले, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे घरभाडे व इतर खर्च सुरू असताना किती दिवस घरी बसणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. व्यापारी वर्गही कमालीचा हैराण झाला आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची गरज होती, असे मत होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मीरानी यांनी व्यक्त केले आहे. सर्वच जण आपल्या घरी अन्नधान्याचा साठा करतात, असा प्रकार नाही. हातावर पोट असणारे अनेक जण रोज सामान भरत असतात. अशा नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे मीरानी म्हणाले. कोविडच्या काळात कर्मचाºयांचा तुटवडा भासत असताना आम्ही घरपोच सामान देऊ शकत नाही. प्रशासनाने सामान लोडिंग अनलोडिंगला परवानगी देणे गरजेचे आहे. त्यातच लॉकडाऊन वाढविताना नागरिक, तसेच व्यापारी वर्गाला पुन्हा एकदा ठरावीक वेळ देण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नसल्याने पुन्हा एकदा जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे मीरानी यांचे म्हणणे आहे. दि होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशन व पनवेल व्यापारी संघटना (किरकोळ) या दोन्ही संघटनांमध्ये रिटेल व खाद्यपदार्थांसह इतर व्यवसाय करणाºया ३५० ते ४०० व्यापाºयांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांची, तसेच व्यापाºयांची गैरसोय होणार नाही, याबाबत पालिके ने विचार करणे गरजेचे असल्याचे मीरानी म्हणाले.लोकप्रतिनिधींनीही या लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही. लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नसल्याचे केणी यांनी स्पष्ट केले.भाज्या खरेदीसाठी धावाधाव : गर्दी टाळण्यासाठी पालिकेने काउंटर विक्री बंद केली असली, तरी अनेक जण भाज्या, फळांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी उघड्यावर विक्रीला बंदी असल्याने पोलीस अथवा पालिका कर्मचारी येताच, फेरीवाल्यांसह नागरिकांची मोठी धावाधाव होत आहे.सोशल मीडियावर नेटकºयांचा उद्रेकदहा दिवसांनी लॉकडाऊन वाढवल्याचे कळताच सोशल मीडियावर या लॉकडाऊनच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, नोकºया गेल्या, अनेकांना रोजगाराचा प्रश्न सतावत आहे. नव्याने सुरुवात करण्यासाठी लॉकडाऊन शिथिलता होेण्याची गरज असल्याचे नागारिकांचे म्हणणे आहे.महापालिकेचे नागरिकांना अवाहनकोरोनाच्या नियंत्रणासाठी पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे अवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढले असले, तरी मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली नसल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :panvelपनवेल