शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

आंबेडकर स्मारकासाठी नागरिक आक्रमक

By admin | Updated: January 26, 2017 03:38 IST

ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम

नवी मुंबई : ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनतेने २६ जानेवारीला वाशी शिवाजी चौकात मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था मोडीत काढली जात असल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बलचे आच्छादन करण्याचा निर्णय मार्च २०१६ च्या सर्वसाधारण सभेने घेतला होता. पण डोमला मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचे कारण देवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १४ जुलैला हा प्रस्ताव रद्द केला. मार्बल न लावण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या खर्चात बचत झाल्याचे त्यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. स्मारकाच्या खर्चात कपात केल्यास व मार्बल न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँगे्रसच्या नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी १६ आॅगस्टच्या सभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून मार्बलच बसविण्यात यावे अशा सूचना केल्या. सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांनीही मार्बल बसविण्याचे मान्य केले होते. पण प्रत्यक्षात यासाठीची कार्यवाही झालीच नाही. महापौर सुधाकर सोनावणे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे याविषयी पाठपुरावा केला होता. पण काहीही उपयोग झाला नसल्याने २६ जानेवारीला मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोळी आगरी महोत्सवासाठी १९ जानेवारीला ऐरोलीत आले होते. स्मारकाचे काम रखडल्याचे समजल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त करून आंदोलन उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आंबेडकर स्मारक समितीने बैठका घेवून मूक निदर्शनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यघटनेने तयार केलेल्या लोकशाही मूल्यांची नवी मुंबईत पायमल्ली होत असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन व प्रशासनास इशारा देण्यासाठी हे आंदोलन असून यानंतरही स्मारकाचे काम सुरू झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून उग्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)