शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आंबेडकर स्मारकासाठी नागरिक आक्रमक

By admin | Updated: January 26, 2017 03:38 IST

ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम

नवी मुंबई : ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनतेने २६ जानेवारीला वाशी शिवाजी चौकात मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था मोडीत काढली जात असल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बलचे आच्छादन करण्याचा निर्णय मार्च २०१६ च्या सर्वसाधारण सभेने घेतला होता. पण डोमला मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचे कारण देवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १४ जुलैला हा प्रस्ताव रद्द केला. मार्बल न लावण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या खर्चात बचत झाल्याचे त्यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. स्मारकाच्या खर्चात कपात केल्यास व मार्बल न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँगे्रसच्या नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी १६ आॅगस्टच्या सभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून मार्बलच बसविण्यात यावे अशा सूचना केल्या. सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांनीही मार्बल बसविण्याचे मान्य केले होते. पण प्रत्यक्षात यासाठीची कार्यवाही झालीच नाही. महापौर सुधाकर सोनावणे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे याविषयी पाठपुरावा केला होता. पण काहीही उपयोग झाला नसल्याने २६ जानेवारीला मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोळी आगरी महोत्सवासाठी १९ जानेवारीला ऐरोलीत आले होते. स्मारकाचे काम रखडल्याचे समजल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त करून आंदोलन उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आंबेडकर स्मारक समितीने बैठका घेवून मूक निदर्शनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यघटनेने तयार केलेल्या लोकशाही मूल्यांची नवी मुंबईत पायमल्ली होत असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन व प्रशासनास इशारा देण्यासाठी हे आंदोलन असून यानंतरही स्मारकाचे काम सुरू झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून उग्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)