शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

आंबेडकर स्मारकासाठी नागरिक आक्रमक

By admin | Updated: January 26, 2017 03:38 IST

ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम

नवी मुंबई : ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनतेने २६ जानेवारीला वाशी शिवाजी चौकात मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था मोडीत काढली जात असल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बलचे आच्छादन करण्याचा निर्णय मार्च २०१६ च्या सर्वसाधारण सभेने घेतला होता. पण डोमला मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचे कारण देवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १४ जुलैला हा प्रस्ताव रद्द केला. मार्बल न लावण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या खर्चात बचत झाल्याचे त्यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. स्मारकाच्या खर्चात कपात केल्यास व मार्बल न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँगे्रसच्या नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी १६ आॅगस्टच्या सभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून मार्बलच बसविण्यात यावे अशा सूचना केल्या. सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांनीही मार्बल बसविण्याचे मान्य केले होते. पण प्रत्यक्षात यासाठीची कार्यवाही झालीच नाही. महापौर सुधाकर सोनावणे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे याविषयी पाठपुरावा केला होता. पण काहीही उपयोग झाला नसल्याने २६ जानेवारीला मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोळी आगरी महोत्सवासाठी १९ जानेवारीला ऐरोलीत आले होते. स्मारकाचे काम रखडल्याचे समजल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त करून आंदोलन उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आंबेडकर स्मारक समितीने बैठका घेवून मूक निदर्शनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यघटनेने तयार केलेल्या लोकशाही मूल्यांची नवी मुंबईत पायमल्ली होत असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन व प्रशासनास इशारा देण्यासाठी हे आंदोलन असून यानंतरही स्मारकाचे काम सुरू झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून उग्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)