शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

उकाडा वाढल्याने नागरिक हैराण, तापमानात सात अंशांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:41 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील थंडी गायब झाली असून, तापमानाचा पारा जवळपास सात अंशांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात असलेला २९ अंशावरील पारा मंगळवारी ३५ अंशावर गेला आहे

नवी मुंबई : गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील थंडी गायब झाली असून, तापमानाचा पारा जवळपास सात अंशांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात असलेला २९ अंशावरील पारा मंगळवारी ३५ अंशावर गेला आहे. वाढती उष्णता व हवेतील आर्द्रतेचे वाढते प्रमाण यामुळे नवी मुंबईकर घामाघूम झाले आहेत. शहरातील किमान तापमान २४ अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे, तर कमाल तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. संक्रांतीनंतर वातावरणात झालेला बदल पाहता नागरिकांना हिवाळ्यातही उकाडा सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून आले.जानेवारी महिन्यात राज्यभर गुलाबी थंडी पसरते. यंदा मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून, तापमानात वाढ झाल्याने हिवाळ्यातही उकाडा अनुभवयास मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस थंडी अनुभवायला मिळाली. मात्र, त्यानंतर हवामानात झालेल्या बदलामुळे किमात तापमानात वाढ झाली. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्री, स्कार्फ, गॉगलचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून, शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये याकरिता द्रव पदार्थांचे सेवन करणे अधिक गरजेचे आहे, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. या उन्हामुळे डोकेदुखी, अंगदुखी तसेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होणाºया आजारांचे प्रमाण वाढल्याची माहिती डॉ. सुनित पेटकर यांनी दिली. कामानिमित्त ११ ते ४ या वेळेत बाहेर असणाºया व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, शक्यतो या वेळेत बाहेर पडू नये, असेही पेटकर यांनी सांगितले.