शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

उकाडा वाढल्याने नागरिक हैराण, तापमानात सात अंशांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:41 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील थंडी गायब झाली असून, तापमानाचा पारा जवळपास सात अंशांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात असलेला २९ अंशावरील पारा मंगळवारी ३५ अंशावर गेला आहे

नवी मुंबई : गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील थंडी गायब झाली असून, तापमानाचा पारा जवळपास सात अंशांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात असलेला २९ अंशावरील पारा मंगळवारी ३५ अंशावर गेला आहे. वाढती उष्णता व हवेतील आर्द्रतेचे वाढते प्रमाण यामुळे नवी मुंबईकर घामाघूम झाले आहेत. शहरातील किमान तापमान २४ अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे, तर कमाल तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. संक्रांतीनंतर वातावरणात झालेला बदल पाहता नागरिकांना हिवाळ्यातही उकाडा सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून आले.जानेवारी महिन्यात राज्यभर गुलाबी थंडी पसरते. यंदा मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून, तापमानात वाढ झाल्याने हिवाळ्यातही उकाडा अनुभवयास मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस थंडी अनुभवायला मिळाली. मात्र, त्यानंतर हवामानात झालेल्या बदलामुळे किमात तापमानात वाढ झाली. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्री, स्कार्फ, गॉगलचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून, शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये याकरिता द्रव पदार्थांचे सेवन करणे अधिक गरजेचे आहे, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. या उन्हामुळे डोकेदुखी, अंगदुखी तसेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होणाºया आजारांचे प्रमाण वाढल्याची माहिती डॉ. सुनित पेटकर यांनी दिली. कामानिमित्त ११ ते ४ या वेळेत बाहेर असणाºया व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, शक्यतो या वेळेत बाहेर पडू नये, असेही पेटकर यांनी सांगितले.