शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पनवेलसह शहरात मुसळधार; विविध भागांमध्ये पाणी साचले; ७ ठिकाणी वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 5:10 AM

मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

नवी मुंबई, पनवेल : मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पनवेलमध्ये इमारत कोसळण्याचीही घटना घडली आहे.नवी मुंबईसह पनवेल परिसरामधील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले होते. मुंबईमध्ये रेल्वेपूल कोसळल्यामुळे अनेकांना कार्यालयात पोहोचता आले नाही. हार्बर मार्गावरील लोकलही उशिराने धावत होत्या. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ पाणी साचल्याचा परिणामही वाहतुकीवर झाला होता. तुर्भे येथे मिनीबसचा अपघात झाल्यामुळे सानपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहारावरही परिणाम झाला होता. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांना व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला होता. मार्केट परिसरामधील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.वारंवार तक्रारी करूनही येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील भुयारी मार्गांमध्येही पाणी साचले होते.ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापे येथे भुयारी मार्ग तयार केला आहे; परंतु या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीस बसू लागला आहे.औद्योगिक वसाहतीमधील नैसर्गिक नाल्यांमध्ये डेब्रिज व इतर कचरा टाकला असल्यामुळे नाल्यातील पाणी रोडवर येऊ लागले आहे. ऐरोलीमधील बस डेपोसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पनवेलमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली होती. इमारत कोसळल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मलमिश्रीत पाणी रस्त्यावरमुसळधार पावसामुळे सारसोळे गावामध्ये मलमिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहत होते. मलवाहिन्या तुंबल्याने जागोजागी ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पादचाºयांसह परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी पालिका अधिकाºयांना ही बाब कळवली असता, सफाई कामगारांनी तुंबलेल्या मलवाहिन्या सफाईचे काम हाती घेतले; परंतु पावसाळ्यापूर्वीच जर योग्यरीत्या नाले, गटारे व मल:निसारण वाहिन्यांची साफसफाई झाली असती, तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. मात्र, अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे सारसोळेवासीयांना दूषित पाण्यातून चालावे लागत असल्याचाही संताप मेहेर यांनी व्यक्त केला.पावसात खड्डे बुजविण्याचा प्रयत्नमहापालिका अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शहरात काही ठिकाणी पाऊस सुरू असताना रोड व पदपथांची कामे सुरू आहेत. नेरूळ सेक्टर २० मध्ये रोडचे डांबरीकरण करण्यात आले आहे. गोठविली गावामध्ये मुसळधार पावसामध्ये खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पावसात सुरू असलेल्या या कामाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.लोकलचीगती मंदावलीपावसामुळे पनवेल-सीएसएमटी तसेच ठाणे-वाशी मार्गावरील लोकलवरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे समोरील परिस्थितीचा अंदाज येत नसल्याने लोकल धिम्या गतीने पळवल्या जात होत्या, यामुळे सर्वच लोकल नियोजित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा त्रास रेल्वेप्रवाशांना सहन करावा लागला.भुयारी मार्गात पाणीप्रतिवर्षी पावसाळ्यात शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांचे पादचारी, तसेच वाहनांचे भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. त्यानुसार मंगळवारीही कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतच्या भुयारी मार्गात सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. एरवी त्या ठिकाणी साचणारे पाणी मोटार लावून बाहेर काढले जाते. मात्र, कायमचा तोडगा म्हणून त्या ठिकाणी पाझरणारे पाणी कायमचे बंद करण्याची शक्कल अद्याप अभियंत्यांना सुचलेली नाही, त्यामुळे मंगळवारी पावसाचा जोर वाढताच त्या ठिकाणी पाणी साचून रहदारीच्या मार्गात अडथळा झाला.वाशीत रस्त्यावर तळेसेक्टर ९ परिसरातील जलमय होऊन रस्ते पाण्याखाली जात आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांकडून रस्त्यालगतच्या गटारांमध्ये कचरा टाकला जात असल्याने पाणी तुंबून ते रस्त्यावर साचत आहे. परिणामी, मुसळधार पाऊस झाल्यास परिसरातील घरांमध्येही पाणी शिरण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते गणेश मिलखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई