शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाघिवली भूखंड वाटप प्रकरणी चौकशी, अहवाल सादर करण्याचे सिडकोला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:21 IST

वाघिवली येथील संरक्षित कुळाचा हक्क डावलून बेलापूर येथे करण्यात आलेल्या भूखंड वाटपाची शासनाने चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने सिडकोला पत्र पाठवून या प्रकरणांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : वाघिवली येथील संरक्षित कुळाचा हक्क डावलून बेलापूर येथे करण्यात आलेल्या भूखंड वाटपाची शासनाने चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने सिडकोला पत्र पाठवून या प्रकरणांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सिडकोच्या दक्षता विभागाने यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे बेलापूर येथे ५३,२00 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर उभारत असलेल्या इराईसाचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडको व महसूल विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून मुंदडा व इराईसा नामक विकासकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंड योजनेपासून वाघिवली गावातील ६६ कुळांना वंचित ठेवले आहे. सातबाºयावरून कुळांची नावे हटवताना जमिनीच्या फेरफारमध्ये खाडाखोड करून मुंदडा नामक सावकाराने व इराईसा कंपनीच्या विकासकाने सुमारे पंधराशे कोटी रु पये किमतीचा हा भूखंड लाटल्याचा आरोप वाघिवली ग्रामस्थांनी केला आहे. या भूखंड गैरव्यवहाराबाबत पोलिसांकडे यापूर्वी तक्रार करूनही त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे धाव घेतली होती.सिडकोने या भूखंड वाटपास कोणत्या कारणास्तव स्थगिती दिली, याचा कोणताही खुलासा आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळे सिडकोने उठविलेल्या स्थगितीचे नेमके कारण काय, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर इराईसा डेव्हलपर्सला २९ जानेवारी २0१६ रोजी बजावलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याच्या सिडकोच्या ८ जून २0१६ च्या आदेशाला स्थगिती देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केली आहे. याअंतर्गत २२ डिसेंबर रोजी सिडकोला पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सिडकोच्या दक्षता विभागाने या संपूर्ण प्रकरणांची नव्याने छाननी सुरू केली असून त्यामुळे इराईसाचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.महापालिकेच्या भूमिकेकडे लक्षइराईसाला बजावलेली कारणे दाखवा नोटीस ८ जून २0१७ रोजी मागे घेण्यात आली. त्यामुळे संबंधित विकासकाने पुन्हा कामाला गती दिली. इराईसाच्या प्रकल्पाला महापालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. या परवानगीची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. त्यामुळे नियमानुसार त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. परंतु सध्या निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यासंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत सिडको महापालिकेला लवकरच पत्र देणार असल्याचे समजते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई