शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

सिडकोची उदासीनता उलवेकरांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:45 IST

सिडकोच्या उदासीन धोरणाचा फटका उलवे नोडमधील रहिवाशांना बसू लागला आहे. उघड्या गटारांमुळे अपघात होऊ लागले आहेत.

नामदेव मोरेनवी मुंबई : सिडकोच्या उदासीन धोरणाचा फटका उलवे नोडमधील रहिवाशांना बसू लागला आहे. उघड्या गटारांमुळे अपघात होऊ लागले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने सिडकोकडून फसवणूक झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.राज्य शासनाने ठाणे, उरण व पनवेल तालुक्यांमधील जमीन संपादित करून नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतला. शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोने नवी मुंबई महापालिका व पनवेल तालुक्यातील नोडचा विकास केला व तिसºया टप्प्यात उरण तालुक्याला प्राधान्य दिले व उलवे नोड विकसित करण्यास सुरुवात केली. या परिसरामधील विकासाला चालना देण्यासाठी उन्नती गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला व २०१२मध्ये नागरिकांना घरांचे वितरण केले. याशिवाय खासगी विकासकांनी शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू केले. सद्यस्थितीमध्ये १९, २०, २१ सेक्टरचा विकास झपाट्याने सुरू आहे. अनेक ठिकाणी नागरिक राहण्यासाठीही आले आहेत; परंतु येथे राहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. सिडकोकडून मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी मलनि:सारणाचे पाणी रोडवरून वाहत असून, प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊ लागली आहे. रोडवरील गटारांवर झाकणे बसविलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी गरोदर महिला गटारात पडल्याची घटना घडली होती. लहान मुलगाही येथील गटारात पडला होता. नागरिकांनी तक्रारी करूनही काहीच दखल घेतली नसल्याने त्याच गटारात पडून एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. पूर्ण उलवे नोडमध्ये गटारांची स्थिती गंभीर असून, अजून किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.उलवे नोडमधील रस्त्याची स्थिती गंभीर आहे. मुख्य रस्त्याची स्थिती ठीक असली, तरी अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे अशक्य होऊ लागले असून, वारंवार अपघात होऊ लागले आहेत. पथदिवेही बसविण्यात आलेले नाहीत. गटारांची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. गटारांची साफसफाई केली जात नसल्याने पाणी रोडवरून वाहू लागले आहे. नोडमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उलवेमध्ये राहण्यासाठी गेलेले नागरिक नोकरीसाठी मुंबई, ठाणे व इतर परिसरामध्ये जात असून, त्यांच्यासाठी वाहतुकीची काहीही साधने नाहीत. एनएमएमटीची बस वेळेत येत नसून, रेल्वे प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. शाळा, रुग्णालय व इतर सर्वच प्रश्न गंभीर झाले आहेत.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही. एनएमएमटी वेळेत येत नाही. रेल्वे प्रकल्प रखडला आहे. उलवेमधून नवी मुंबई व इतर ठिकाणी जाण्यासाठी पुरेशा सुविधाच नाहीत.- प्रकाश गोगावले, रहिवासी, उलवेसेक्टर २१ मधील गटारात पावसाळ्यात एक मुलगा पडला होता. काही दिवसांपूर्वी गरोदर महिलाही गटारात पडली होती. मंगळवारी गटारात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे.- मंजुळा तळे,सामाजिक कार्यकर्त्या सेक्टर २१उलवे नोडमधील मलनि:सारण वाहिन्यांचे काम रखडले आहे. डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.- श्रीराग कमलासनन,उपाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षसिडकोने उलवे नोडमधील समस्या सोडविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नोडचा विकास धीम्या गतीने सुरू आहे. रोड, गटार, पथदिवे, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व इतर सर्व सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.- कृष्णा पाटील, सामाजिक कार्यकर्तेउलवे नोडमध्ये परवडणारी घरे उपलब्ध असल्याने चार वर्षांपासून अनेकांनी घरे खरेदी केली आहेत; परंतु सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरे बंद ठेवावी लागली आहेत. सिडको प्रशासन नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. अजून किती दिवस गैरसोयी सहन करायच्या?- राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते