शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आसुडगावजवळील सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्पही अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:26 IST

ट्रक टर्मिनलवरील इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न : बांधकामाच्या वेळी पार्किंगचाही मोठा प्रश्न

कळंबोली : पंतप्रधान आवास योजनेला खांदेश्वर, मानसरोवर तसेच खांदा कॉलनीत जोरदार विरोध होत आहे. तसेच आसुडगाव येथील ट्रक टर्मिनल्सच्या वरती जे टॉवर बांधले जातील तेही सुरक्षित कसे राहतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याशिवाय जेव्हा काम सुरू होईल त्याप्रसंगी जड वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून, याविषयी सिडकोला निवेदनही दिले आहे.

नवी मुंबई तसेच पनवेल परिसरात सिडकोचे जितके बस टर्मिनल्स आहेत. तिथे खाली बस थांबे व वरती पंतप्रधान आवास योजनेच्या नावाने गरीब व गरजूंकरिता घरे बांधली जाणार आहेत. सिडकोने अलीकडेच हे नियोजन केले आहे. त्याकरिता त्यांनी पहिल्या नियोजनामध्ये बदल केला आहे. इतर भूखंड विकण्यासाठी मिळावेत म्हणून त्यांच्याकडूनही धोरण हाती घेण्यात आल्याचा आरोप विविध सामाजिक संस्था करीत आहेत. खांदेश्वर, मानसरोवर आणि खांदा कॉलनीत येथील भूखंडावर अशा प्रकारे घरे बांधण्याकरिता तीव्र विरोध आणि नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रक टर्मिनल्ससाठी प्लॅन करण्यात आलेल्या जागेवरही अशाच प्रकारे इमारती बांधल्या जाणार आहेत. आसुडगाव एनएमएमटी आगारासमोर सिडकोची दोन भूखंडावर मोठी पार्किंग आहेत. त्या ठिकाणीही खाली वाहनतळ आणि वरती पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधली जाणार आहेत.

खांदा वसाहतीच्या आजूबाजूला मोठी हाउसिंग स्कीम राबविण्याचे सिडकोचे नियोजन आहे; परंतु ज्या कारणाकरिता ही जागा राखीव आहे, त्याला दुय्यम स्थान देत त्या जागेवर गृहनिर्माण करण्यात येत आहे. याबाबतही वेगवेगळ्या पद्धतीने विरोध होत आहे.या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर या वाहनतळावर उभे राहणारे ट्रक, ट्रेलर, डम्पर ही अवजड वाहने कुठे उभी राहणार, असा प्रश्न प्रभाग समिती ‘ड’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोचे एमडी व मुख्य नियोजनकाराला विचारला आहे. वाहने उभी करण्याकरिता पर्यायी व्यवस्था सिडकोने केली नाही. ती अगोदर करावी आणि मगच हा प्रकल्प हाती घ्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.रस्त्यावर वाहने उभी राहण्याची शक्यताच्ट्रक ट्रर्मिनल्सच्या जागेवर इमारतीचे काम हाती घेतल्यानंतर जेएनजीटी, स्टील मार्केट आणि इतर जाण्याकरिता येथे आलेल्या वाहनांना उभे राहण्याकरिता जागाच शिल्लक राहणार नाही.च्मग ते कॉलनीतील रस्त्यावर उभे राहतील, यामुळे कोंडी, अपघात होतील याचा विचार सिडकोने केला नसल्याचे मत भाजपचे पदाधिकारी दशरथ म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

याला जबाबदार कोण?च्भविष्यात वाहनतळ खाली झाले आणि वरती इमारती उभ्या राहिल्या. दुर्दैवाने एखादा रसायनच्या टँकरचा स्फोट झाला. किंवा इतर वाहनांना आग लागली, त्या वेळी इमारतीला धोका पोहोचणार नाही का? याला जबाबदार कोण असेल, असे प्रश्नच्नवनाथ मेंगडे यांना पडले आहेत. सिडकोने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करून हा प्रकल्प उभारावा, असे मत खांदा कॉलनीतील रहिवासी रोहण व्हटकर यांनी व्यक्त केले.