शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

सिडकोला वाहनतळांचा विसर

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा करणाऱ्या सिडकोला नवी मुंबईमध्ये प्रत्येक नोडमध्ये वाहनतळ बनविण्याचा विसर पडला आहे. शहरात सद्य:स्थितीमध्ये ३ लाख ३९ हजार वाहने आहेत.

- प्राची सोनावणे,  नवी मुंबईस्मार्ट सिटी बनविण्याचा दावा करणाऱ्या सिडकोला नवी मुंबईमध्ये प्रत्येक नोडमध्ये वाहनतळ बनविण्याचा विसर पडला आहे. शहरात सद्य:स्थितीमध्ये ३ लाख ३९ हजार वाहने आहेत. बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे ही संख्या चार लाखांवर जात आहे. एवढ्या वाहनांसाठी वाशीत एकच ट्रक टर्मिनल असून वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली आहे. परंतु त्यांनी यापूर्वी निर्माण केलेल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील त्यांचे नियोजन तीन दशकांमध्येच चुकल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मुंबईमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती केली. भविष्यात या शहरामध्येही वाहनांची संख्या वाढणार असल्याचा सिडकोला विसर पडला. शहरात १४,३०७ ट्रक, २,३६५ टँकर, चारचाकी मालवाहतूक वाहने ५,५३९ व तब्बल ४,१६९ ट्रेलर आहेत. या सर्व वाहनांसाठी शहरात सद्य:स्थितीमध्ये फक्त एकच ट्रक टर्मिनल आहे. यामध्ये ३ ते ४ हजार वाहनेच उभी करता येतात. त्यापेक्षा दुप्पट वाहने मुंबई बाजार समितीच्या परिसरात रोडवर उभी करावी लागत आहेत. स्कूल बसेससह इतर सर्व प्रकारची वाहने रोडवर उभी करावी लागत आहेत. रेल्वे स्टेशनसमोर वाहनतळाची सोय केली आहे. परंतु त्याव्यतिरिक्त वसाहतीमध्ये कुठेच जागा ठेवलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी मैदानांचा वापर वाहनतळ म्हणून केला जात आहे. शहरातील बाजारपेठा, मॉल, हॉटेल व इतर वर्दळीच्या ठिकाणीही वाहने उभी करता येत नाहीत. यामुळे नागरिकांना नाइलाजाने वाहने जागा मिळेल तेथे उभी करावी लागत आहेत. या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करतात. रोज २०० ते ४०० नागरिकांना रोज रोडवर वाहने उभी केल्यामुळे दंड भरावा लागत आहे. सिडकोने केलेल्या चुका दुरुस्त करणे महापालिकेलाही शक्य झालेले नाही. महापालिकेने मागील २४ वर्षांमध्ये वाहनतळासाठी ठोस प्रयत्नच केले नाहीत. सिडकोकडून सामाजिक सुविधांसाठी भूखंड घेताना वाहनतळासाठी मात्र कधीच भूखंड मिळविला नाही. वाशी, शिवाजी चौक ते दहावी - बारावी बोर्डाच्या कार्यालयापर्यंत नाल्यावर ५ कोटी रुपये खर्च वाहनतळ उभा केला आहे. याशिवाय सीबीडी सेक्टर ११ मध्येही वाहनतळ उभारला आहे. परंतु या वाहनतळाचा वापरच होत नाही. नागरिकही बेशिस्तपणे रोडवर वाहने उभी करीत आहेत. जोपर्यंत वाहनतळावर वाहने उभी करण्याची सक्ती केली जाणार नाही तोपर्यंत अधिकृत वाहनतळाचा वापर होणार नाही. शहरात वाहतुकीचा आताच बोजवारा उडाला आहे. याबाबत योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात पार्किंगवरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.महापालिकेचेही दुर्लक्ष नवी मुंबई महानगरपालिकेनेही सिडकोने केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. दोन वाहनतळ उभारले, परंतु त्याचा वापरच व्यवस्थित होत नाही. शहरामध्ये पार्किंग सर्वात गंभीर प्रश्न झाला असून, वाहने उभी करण्यावरून भांडणेही होऊ लागली आहेत. परंतु या समस्येकडे पालिकाही दुर्लक्षच करीत आहे. नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता त्यानुसार ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. शहरात पार्किंंग झोन तयार केले गेले पाहिजेत तसेच एनएमएमटी बससेवेतील सर्व्हिस रूट्स वाढविले जावेत. शहरात वाहनतळ नसल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळते. वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या वाहनांचे निकाल लावून रस्ते मोकळे करून दिले पाहिजेत. वाहतूककोंडीची समस्या टाळण्याकरिता शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढला पाहिजे आणि त्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.- संजय धायगुडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी. शहरातील वाहनांची वर्षनिहाय स्थिती वर्षट्रकट्रेलरटँकर कारमोटारसायकल इतर एकूण२०१२१०,८७९३,१३७१,७२०७५,५२५१,०३,४३२४१,६३१२३६३२४२०१५१४,३०७४,१६९२,३६५१,०६,४३०१,५५,८०७५६,०५०३३९१२८