शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील ‘सल्लागार’राज अखेर संपुष्टात; मानधन व सुविधांवरील कोट्यवधी रुपयांची होणार बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 02:31 IST

मागील अनेक वर्षांपासून सिडकोच्या विविध विभागांत सुरू असलेले ‘सल्लागार’राज संपुष्टात आले आहे. सल्लागारासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागत होते.

- कमलाकर कांबळे ।

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून सिडकोच्या विविध विभागांत सुरू असलेले ‘सल्लागार’राज संपुष्टात आले आहे. सल्लागारासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागत होते. हा खर्च अनाठायी वाटल्याने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मुदत संपलेल्या सल्लागारांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत बहुतांशी विभागातील सल्लागार कमी करण्यात आले आहेत.सिडको हे राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. या महामंडळाचा कारभार विविध १८ विभागांच्या माध्यमातून चालतो. यात पणन, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, मालमत्ता, व्यवस्थापन, नियोजन, भूमी व भूसंपादन, पुनर्वसन, समाजसेवा व जनसंपर्क आदी प्रमुख विभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत सिडकोने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, मेट्रो, नेरुळ-उरण रेल्वे हे प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत.या प्रमुख प्रकल्पांसह विविध विभागांच्या कामकाजावर देखरेख व नियोजन करण्यासाठी सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी नामांकित सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली होती. त्याचबरोबर सल्लागार म्हणून काही सेवानिवृत्त अधिकाºयांचेही पुनर्वसन करण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपयांचे मानधन व इतर सुविधा दिल्या जात होत्या.या सल्लागारांचा संबंधित विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप वाढू लागल्याने कामगार संघटनांनी त्याला विरोध दर्शविला होता. तसेच या सल्लागार पद्धतीमुळे सिडकोतील अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत असल्याचा आरोप केला जात होता. वर्षभरापूर्वी भाटीया यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली. गगराणी यांनी सल्लागार संस्कृतीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन ही पद्धती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षभरात मुदत संपुष्टात आलेल्या सल्लागार कंपन्या आणि सेवानिवृत्त अधिकाºयांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे सिडकोच्या कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.सिडकोची स्थापना झाली, तेव्हा २२०० इतका कर्मचारी वर्ग होता. गेल्या ४५ वर्षांत अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले आहेत. सध्या केवळ १३०० कर्मचारी शिल्लक आहेत. पुढील वर्षभरात यातील अनेक कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर आहेत. सिडकोच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अनुभवी अधिकाºयांची गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील कर्मचाºयांची अलीकडेच भरती करण्यात आली आहे. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांची भरती कार्यवाहीच्या प्रक्रियेत आहे.गेल्या वर्षभरात मुदत संपलेल्या बहुतांशी सल्लागारांना नारळ देण्यात आला आहे. मार्केटिंग विभागात तज्ज्ञ अधिकाºयांची गरज असल्याने, सेवानिवृत्त झालेले विवेक मराठे यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचीही मुदत संपुष्टात आली आहे. मराठे यांचा अपवाद सोडता बहुतांशी विभागातील ‘सल्लागार’राज संपुष्टात आले आहे.सल्लागार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशीच स्थिती सिडकोत निर्माण झाली होती. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम जाणवत होता. या पार्श्वभूमीवर सल्लागार पद्धती बंद होणे गरजेचे होते. व्यवस्थापनाचा हा निर्णय सिडकोच्या हिताचा आहे.- जे. टी. पाटील,जनरल सेक्रेटरी,सिडको एम्प्लॉइज युनियन