शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन साधेपणाने; आठही हुतात्म्यांना २१ बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 14:36 IST

पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.

मधुकर ठाकूर 

उरण :  गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा ९३ वा  स्मूतीदिन कार्यक्रम सोमवारी (२५) सप्टेंबर रोजी अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती, विकासाचा अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी  याआधीच ग्रामसभेत चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.  स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सत्ते विरोधात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेरच्या जंगल सत्याग्रहात शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला.या गोळीबारात उरण तालुक्यातील धाकू गवत्या फोफेकर ,नाग्या महादू कातकरी - ( चिरनेर),आलू बेमट्या म्हात्रे - (दिघोडे),आनंदा माया पाटील- (धाकटी जुई),रामा बामा कोळी- ( मोठी जुई), मोरेश्वर रघुनाथ शिंदे(न्हावी) - (कोप्रोली),परशुराम रामा पाटील -( पाणदिवे) व हसुराम बुधाजी घरत- (खोपटे) या आठ शूरविरांनी चिरनेर गावातील आक्कादेवीच्या माळरानावर वीर मरण आले.या रणसंग्रामाच्या स्मृतीना उजाळा मिळावा व युवा पिढी समोर आपल्या पुर्वजानच्या इतिहासाचे स्मरण व्हावे यासाठी चिरनेर ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी चिरनेर येथे स्मृतीदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.

मात्र ऐतिहासिक चिरनेर गाव विकास कामांपासून कायमच वंचित राहिला आहे.आता तर धनदांडग्यांनी रस्ते, नाले आणि गावातील हद्दीत ठिकठिकाणी केलेल्या वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांमुळे चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.या परिस्थितीचे निराकरण व्हावे यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाला वारंवार साकडे घातले आहे.

मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही शासकीय यंत्रणेकडून त्याकडे पुर्णपणे दुर्लक्षच केले जात आहे.यामुळे मात्र चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त करीत चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.याआधी कोरोना महामारीच्या काळातही दोन वर्षे स्मृतीदिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता.

 त्यामुळे हुतात्म्यांच्या वासरांचे सत्कार, विविध राजकीय पक्षांच्या पुढारी, नेत्यांच्या भाषणांना फाटा देत यावर्षी हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.