शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन साधेपणाने; आठही हुतात्म्यांना २१ बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 14:36 IST

पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.

मधुकर ठाकूर 

उरण :  गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा ९३ वा  स्मूतीदिन कार्यक्रम सोमवारी (२५) सप्टेंबर रोजी अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.वारंवार उद्भवणारी पुरपरिस्थिती, विकासाचा अभावामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी  याआधीच ग्रामसभेत चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.  स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सत्ते विरोधात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेरच्या जंगल सत्याग्रहात शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला.या गोळीबारात उरण तालुक्यातील धाकू गवत्या फोफेकर ,नाग्या महादू कातकरी - ( चिरनेर),आलू बेमट्या म्हात्रे - (दिघोडे),आनंदा माया पाटील- (धाकटी जुई),रामा बामा कोळी- ( मोठी जुई), मोरेश्वर रघुनाथ शिंदे(न्हावी) - (कोप्रोली),परशुराम रामा पाटील -( पाणदिवे) व हसुराम बुधाजी घरत- (खोपटे) या आठ शूरविरांनी चिरनेर गावातील आक्कादेवीच्या माळरानावर वीर मरण आले.या रणसंग्रामाच्या स्मृतीना उजाळा मिळावा व युवा पिढी समोर आपल्या पुर्वजानच्या इतिहासाचे स्मरण व्हावे यासाठी चिरनेर ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी चिरनेर येथे स्मृतीदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.

मात्र ऐतिहासिक चिरनेर गाव विकास कामांपासून कायमच वंचित राहिला आहे.आता तर धनदांडग्यांनी रस्ते, नाले आणि गावातील हद्दीत ठिकठिकाणी केलेल्या वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांमुळे चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.या परिस्थितीचे निराकरण व्हावे यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाला वारंवार साकडे घातले आहे.

मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही शासकीय यंत्रणेकडून त्याकडे पुर्णपणे दुर्लक्षच केले जात आहे.यामुळे मात्र चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त करीत चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९३ वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.याआधी कोरोना महामारीच्या काळातही दोन वर्षे स्मृतीदिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता.

 त्यामुळे हुतात्म्यांच्या वासरांचे सत्कार, विविध राजकीय पक्षांच्या पुढारी, नेत्यांच्या भाषणांना फाटा देत यावर्षी हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैऱ्या हवेत झाडत चिरनेर हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.