शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

तिखट मिरची झाली गोड; भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा

By नामदेव मोरे | Updated: April 12, 2024 19:28 IST

आंध्र प्रदेशसह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आवक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उन्हाचा तडाखा वाढू लागल्यापासून गृहिणींची वर्षभर लागणारी चटणी व इतर वस्तू बनविण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीचे दर जवळपास निम्यावर आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, तिखट मिरची गोड झाल्याची भावना गृहिणींमधून व्यक्त होत आहे.

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन मिरचीची आवक होत आहे. गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील हंगाम जवळपास संपला असून, आता आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणामधून मिरची विक्रीसाठी येत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीचे दर कमी असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळू लागला आहे. गतवर्षी बेडगी मिरचीचे दर प्रतिकिलो ५०० ते ७०० रुपये होते. यावर्षी हेच दर २५० ते २५० रुपयांवर आले आहेत. तेजाचे दर २०० ते ३०० वरून २२० ते २३० रुपये किलो झाले आहेत. काश्मीरी मिरचीचे दर ६५० ते ८०० रुपये किलोवरून ३५० ते ५०० रुपये किलोवर आले आहेत. दर कमी झाल्यामुळे गृहिणींचीही वर्षभराची चटणी तयार करण्यासाठी लगबग सुरू असून, प्रत्येक डंकावर मिरची कुटून घेण्यासाठी गर्दी झालेली दिसत आहे.

        बाजार समितीमध्ये मिरचीचा हंगाम जवळपास संपत आला असला तरी मे महिन्यापर्यंत ग्राहकांकडून मागणी राहणार असून, यावर्षी दर कमीच राहतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

गतवर्षी उत्पादन कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले होते. यावर्षी मिरचीचे दर कमी असून, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेकडून राज्यांमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.-अमरीश बरोत, व्यापारी प्रतिनिधी, मसाला मार्केटधने, हळद, तेज पत्त्याची तेजी सुरूचमिरचीचे दर कमी झाले असले तरी इतर मसाल्यांच्या दरामध्ये मात्र वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये हळदीचे दर प्रतिकिलो १४० ते २१० रुपये होते. आता हळद होलसेल मार्केटमध्ये १६० ते २२० रुपये किलो दराने विकली जात आहे. धने ६० ते १४० वरून ९० ते १७० रुपये, दगडफूल २८० ते ४०० वरून ३०० ते ४५० रुपये, काळी मिरी ६०० ते ८५० वरून ६५० ते ९५० रुपये व तेज पत्ता ३९ ते ५५ वरून ४५ ते ९० रुपये किलोवर पाेहोचले आहेत.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती