शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

नेरुळमधील रस्त्यांना गॅरेजचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:52 IST

नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत.

नवी मुंबई : नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना देखील ये-जा करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.नेरु ळमधील एल.पी. जंक्शन या रस्त्याच्या शेजारीच असलेल्या डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठासमोर पेट्रोल पंपाच्या शेजारील शॉपिंग सेंटरमध्ये चारचाकी वाहनांचे गॅरेजची दुकाने आहेत. शिरवणे गावातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणावर गॅरेज थाटण्यात आले आहेत. गॅरेज असलेल्या दुकानांसमोरील रस्त्यावर दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने दुरुस्ती, रेडियम, पेंटिंग, टायर आदी कामे केली जात असल्याने वाहने पदपथ आणि रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या उभी केली जात आहेत.नेरुळ सेक्टर-६ येथील पामबीच मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरदेखील गॅरेज थाटण्यात आली आहेत. या रस्त्यावरून नागरिकांची आणि वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच शाळा, कॉलेज आणि कामानिमित्त ये-जा करणारे नागरिकदेखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. अनेक ठिकाणी गॅरेज असलेल्या दुकानासमोरील जागेमध्ये गॅरेजवाल्यांनी विविध साहित्य ठेवले असून पदपथाचा वापरही साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई