शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

नेरुळमधील रस्त्यांना गॅरेजचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:52 IST

नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत.

नवी मुंबई : नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना देखील ये-जा करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.नेरु ळमधील एल.पी. जंक्शन या रस्त्याच्या शेजारीच असलेल्या डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठासमोर पेट्रोल पंपाच्या शेजारील शॉपिंग सेंटरमध्ये चारचाकी वाहनांचे गॅरेजची दुकाने आहेत. शिरवणे गावातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणावर गॅरेज थाटण्यात आले आहेत. गॅरेज असलेल्या दुकानांसमोरील रस्त्यावर दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने दुरुस्ती, रेडियम, पेंटिंग, टायर आदी कामे केली जात असल्याने वाहने पदपथ आणि रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या उभी केली जात आहेत.नेरुळ सेक्टर-६ येथील पामबीच मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरदेखील गॅरेज थाटण्यात आली आहेत. या रस्त्यावरून नागरिकांची आणि वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच शाळा, कॉलेज आणि कामानिमित्त ये-जा करणारे नागरिकदेखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. अनेक ठिकाणी गॅरेज असलेल्या दुकानासमोरील जागेमध्ये गॅरेजवाल्यांनी विविध साहित्य ठेवले असून पदपथाचा वापरही साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई