शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
4
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
5
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
6
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
7
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
8
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
9
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
10
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
11
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
12
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
14
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
15
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
16
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
17
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
18
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
19
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
20
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?

जादा नफ्याच्या आमिषाने फसवणूक

By admin | Updated: April 28, 2017 00:21 IST

नागरिकांना झटपट श्रीमंतीचे आमिष दाखवणाऱ्या एमएलएम कंपन्यांचे देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळे पसरत चालले आहे.

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई नागरिकांना झटपट श्रीमंतीचे आमिष दाखवणाऱ्या एमएलएम कंपन्यांचे देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळे पसरत चालले आहे. अशा कंपन्यांकडून नागरिकांच्या फायद्याऐवजी फसवणुकीची अधिक शक्यता असून, तसे प्रकार देखील यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे आजवर दुर्लक्षित ठरलेल्या या कंपन्यांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.सद्यस्थितीला प्रत्येकाची आपली आर्थिक कुवत उंचावण्याचे प्रयत्न सुरूअसल्याचे पहायला मिळते. त्यामुळे समाजात वेगळी प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात अनेक जण झटपट श्रीमंत होण्याचे नवनवीन मार्ग आजमावत असतो. अशांचे समूह अनेक देशांमध्ये सक्रिय झाले आहेत. त्याकरिता गुंतवणूकदारांना जादा नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्या चालवल्या जात आहेत. सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आलेल्या मल्टी लेवल मार्केटिंग (एमएलएम) कंपन्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. त्यापैकी काही कंपन्या अवघ्या काही वर्षांतच बंद पडल्याने, फसवणूक झालेल्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यामुळे अशा कंपन्यांच्या आमिषाला नागरिक बळी पडू नयेत याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.साखळी पध्दतीने चालणाऱ्या या एमएलएम कंपन्यांकडून सुरवातीच्या काही गुंतवणूकदारांना नफा दिला जातो. परंतु त्यानंतर जोडल्या जाणाऱ्या सदस्यांना गुंतवणुकीचा मोबदला मिळेलच असे नाही. शिवाय ठरावीक वर्षांनंतर गुंतवणूकदारांची संख्या वाढलेली असते. त्यामुळे कोट्यवधीची रक्कम जमा झाल्यानंतर संबंधितांकडून कार्यालयाला टाळा ठोकून पळ काढला जातो. अनेकदा गुंतवणूकदारांना मोबदला म्हणून दिले जाणारे चेक देखील वटत नाहीत. परंतु पोलिसांकडे तक्रार करेपर्यंत संबंधितांनी धूम ठोकलेली असते. असे प्रकार टाळण्यासाठी जादा नफ्याचे अथवा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणुकीला प्रवृत्त करणाऱ्या कंपन्यांपासून लांब राहणेच नागरिकांच्या हिताचे ठरू शकते.असाच फसवणुकीचा प्रकार टाळण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी रविवारी आंतरराष्ट्रीय वन कॉइन या मार्केटिंग कंपनीच्या सेमिनारवर छापा टाकून त्यांचा कट उधळून लावला. याप्रकरणी अठरा जणांना अटक देखील करण्यात आली आहे. देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी आरबीआयची परवानगी आवश्यक असून नियमावली देखील ठरवून देण्यात आलेली आहे. मात्र आरबीआयचे सर्व नियम धाब्यावर बसवून एमएलएम कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना झटपट श्रीमंतीचे दिवास्वप्न दाखवत जादा नफ्याचे आमिष दिले जात आहे. त्यात फसला जाणारा सर्वाधिक घटक हा मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. स्वत:कडील जमा रकमेची गुंतवणूक करून मिळणाऱ्या नफ्यातून स्वत:ची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांचा उद्देश असतो. झालेली ही फसवणूक अनेकांच्या जिवावर देखील बेतू शकते. त्यामुळे एमएलएम कंपन्यांच्या होणाऱ्या सेमिनारवर पोलिसांनी पाळत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.