शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शालेय सहलींचा बदलतोय ट्रेंड

By admin | Updated: February 8, 2016 02:48 IST

ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात

सिकंदर अनवारे,  दासगावऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात; मात्र हा ट्रेंड आता काळाबरोबर बदलण्याची प्रथा शैक्षणिक संस्था करीत आहेत. मोठ्या शहरांतील इंग्रजी तसेच इंटरनॅशनल नावाच्या निवासी शाळांच्या सहली वॉटर पार्क, समुद्रकिनारी काढल्या जात आहेत. आता याचे अनुकरण छोट्या शहरातील शाळादेखील करू लागल्या आहेत. शैक्षणिक सहल या व्याख्येलाच फाटा फोडणाऱ्या शाळांवर कारवाईची गरज मुरुडमधील दुर्घटनेनंतर समोर येत आहे. मुरुड समुद्रकिनाऱ्यावर घडलेली दुर्घटना दुर्दैवी असली तरी या घटनेने शैक्षणिक सहली आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत प्रश्न निर्माण केला आहे. मुळातच शैक्षणिक सहली पूर्वीपासून विविध ऐतिहासिक स्थळे, शैक्षणिक किंवा औद्योगिक संकुले, कारखाने, वस्तुसंग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे आदी ठिकाणी नेल्या जात होत्या. याबाबत विद्यार्थ्यांनादेखील उत्सुकता निर्माण होत असे. पुस्तकात वाचत असलेले स्थळ समोर पाहताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आपोआपच जागी होते.ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा मिळते. तर कारखान्यात कोणती वस्तू कशी बनते, हे पाहताना विद्यार्थ्यांना उत्सुकता निर्माण होते. अशा शैक्षणिक सहलींमधून मुलांच्या अभ्यासात आणि बुध्दीत अवांतर भर पडते. आजही अनेक ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचा कल हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याकडेच अधिक प्रमाणात आहे. शाळा, महाविद्यालयांच्या सहली या केवळ सहली नसून त्या शैक्षणिक सहली आहेत. मात्र या संकल्पनेला फाटा देत मोठ्या शहरांतील किंवा इंग्रजी निवासी शाळांचा कल हा वॉटर पार्क आणि समुद्रकिनारे पाहण्याकडेच वळला आहे. यामुळे आता या सहली विद्यार्थ्यांच्या मौजमजेच्या होत चालल्या आहेत. त्यातून शैक्षणिक हा विषय दूर गेला आहे. अशा धोकादायक ठिकाणी काढण्यात आलेल्या सहलींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र मुरुड घटनेने ऐरणीवर आला आहे.शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून पूर्वपरवानगी काढणे गरजेचे असते. त्या परवानगीनंतर सहलीची जबाबदारी ही त्या शाळेची असते. ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी, शाळा आर्थिक विवंचनेला तोंड देत सहलींचे आयोजन करतात. त्यामुळे वॉटर पार्कसारखी खर्चीक ठिकाणे या ग्रामीण सहलींना परवडत नाहीत.सहलींचा बदलता ट्रेंड पाहता सहली काढताना शाळांकडे पुरेसा कमचारीवग देखील उपलब्ध नसतो. एका सहलीमध्ये किमान १०० च्या वर मुलांचा समावेश असतो, मात्र त्या मानाने शिक्षकांची संख्या कमी असते. अनेक शाळांकडून सहली काढताना खासगी वाहनांचा वापर केला जातो. सर्वत्र एसटी महामंडळाच्या गाड्यांना सुरक्षेकरिता प्राधान्य असताना खासगी वाहनांच्या केलेल्या वापराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्र ही ऐतिहासिक, सांस्कृतिक भूूमी आहे. या भूमीमध्ये अनेक राजे, संत, विचारवंत, वैज्ञानिक, लेखक घडले आहेत. अशा महाराष्ट्रात गडकिल्ले, पुरातन मंदिरे, तलाव, लेणी, ब्रिटिशकालीन वास्तू आदी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बदलत्या शैक्षणिक सहलींच्या ट्रेंडने याचा विसर पडत आहे.