शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

शालेय सहलींचा बदलतोय ट्रेंड

By admin | Updated: February 8, 2016 02:48 IST

ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात

सिकंदर अनवारे,  दासगावऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात; मात्र हा ट्रेंड आता काळाबरोबर बदलण्याची प्रथा शैक्षणिक संस्था करीत आहेत. मोठ्या शहरांतील इंग्रजी तसेच इंटरनॅशनल नावाच्या निवासी शाळांच्या सहली वॉटर पार्क, समुद्रकिनारी काढल्या जात आहेत. आता याचे अनुकरण छोट्या शहरातील शाळादेखील करू लागल्या आहेत. शैक्षणिक सहल या व्याख्येलाच फाटा फोडणाऱ्या शाळांवर कारवाईची गरज मुरुडमधील दुर्घटनेनंतर समोर येत आहे. मुरुड समुद्रकिनाऱ्यावर घडलेली दुर्घटना दुर्दैवी असली तरी या घटनेने शैक्षणिक सहली आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत प्रश्न निर्माण केला आहे. मुळातच शैक्षणिक सहली पूर्वीपासून विविध ऐतिहासिक स्थळे, शैक्षणिक किंवा औद्योगिक संकुले, कारखाने, वस्तुसंग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे आदी ठिकाणी नेल्या जात होत्या. याबाबत विद्यार्थ्यांनादेखील उत्सुकता निर्माण होत असे. पुस्तकात वाचत असलेले स्थळ समोर पाहताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आपोआपच जागी होते.ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा मिळते. तर कारखान्यात कोणती वस्तू कशी बनते, हे पाहताना विद्यार्थ्यांना उत्सुकता निर्माण होते. अशा शैक्षणिक सहलींमधून मुलांच्या अभ्यासात आणि बुध्दीत अवांतर भर पडते. आजही अनेक ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचा कल हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याकडेच अधिक प्रमाणात आहे. शाळा, महाविद्यालयांच्या सहली या केवळ सहली नसून त्या शैक्षणिक सहली आहेत. मात्र या संकल्पनेला फाटा देत मोठ्या शहरांतील किंवा इंग्रजी निवासी शाळांचा कल हा वॉटर पार्क आणि समुद्रकिनारे पाहण्याकडेच वळला आहे. यामुळे आता या सहली विद्यार्थ्यांच्या मौजमजेच्या होत चालल्या आहेत. त्यातून शैक्षणिक हा विषय दूर गेला आहे. अशा धोकादायक ठिकाणी काढण्यात आलेल्या सहलींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र मुरुड घटनेने ऐरणीवर आला आहे.शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून पूर्वपरवानगी काढणे गरजेचे असते. त्या परवानगीनंतर सहलीची जबाबदारी ही त्या शाळेची असते. ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी, शाळा आर्थिक विवंचनेला तोंड देत सहलींचे आयोजन करतात. त्यामुळे वॉटर पार्कसारखी खर्चीक ठिकाणे या ग्रामीण सहलींना परवडत नाहीत.सहलींचा बदलता ट्रेंड पाहता सहली काढताना शाळांकडे पुरेसा कमचारीवग देखील उपलब्ध नसतो. एका सहलीमध्ये किमान १०० च्या वर मुलांचा समावेश असतो, मात्र त्या मानाने शिक्षकांची संख्या कमी असते. अनेक शाळांकडून सहली काढताना खासगी वाहनांचा वापर केला जातो. सर्वत्र एसटी महामंडळाच्या गाड्यांना सुरक्षेकरिता प्राधान्य असताना खासगी वाहनांच्या केलेल्या वापराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्र ही ऐतिहासिक, सांस्कृतिक भूूमी आहे. या भूमीमध्ये अनेक राजे, संत, विचारवंत, वैज्ञानिक, लेखक घडले आहेत. अशा महाराष्ट्रात गडकिल्ले, पुरातन मंदिरे, तलाव, लेणी, ब्रिटिशकालीन वास्तू आदी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र बदलत्या शैक्षणिक सहलींच्या ट्रेंडने याचा विसर पडत आहे.