शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीपुढे उद्योग टिकविण्याचे आव्हान; निम्याहून अधिक कामगारांनी गाठले गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 00:35 IST

मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : लॉकडाउनमुळे नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रदेखील धोक्यात आले आहे. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम करणारे निम्म्याहून अधिक कामगार गावाकडे पळाले आहेत. त्यामुळे लॉकडाउननंतर उद्योग सुरू झाल्यास औद्योगिक क्षेत्राला पुन्हा उभारी मिळणे कठीण झाले आहे.

मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यानंतरदेखील लॉकडाउन हटविला जाण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, मागील दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या चाकरमान्यांनीही गावाकडे धाव घेतली आहे. त्यामध्ये नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचाही समावेश आहे.

राज्याच्या विविध भागांतील तसेच परराज्यांतील हे कामगार आहेत. त्यांनी गाव गाठल्याचा धसका औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी घेतला आहे. वर्षानुवर्षे काम करणारे कामगार निघून गेल्याने, लॉकडाउननंतर पुन्हा उद्योग सुरू झाल्यास प्रशिक्षित कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याचा परिणाम उत्पादन निर्मितीवर पुढील वर्षभर होऊ शकतो. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची मागणी उद्योजकांच्या संघटनेने शासनाकडे केली होती; परंतु शासनाकडून केवळ अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती.

लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग वगळता सर्व उद्योग बंद आहेत. त्या ठिकाणचे कामगार गावी निघून गेल्यामुळे उद्योजकांना पुन्हा उद्योग सुरू करताना अडचण भासणार आहे. याचा मोठा फटका संबंधित व्यवसायासह शासनालादेखील बसणार आहे.- मंगेश ब्रह्मे, व्यवस्थापक, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज् असोसिएशन

उद्योग टिकविण्यासाठी कामगार टिकविणे गरजेचे होते. त्यानुसार कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती. परंतु सतत पाठपुरावा करूनदेखील ठोस निर्णय झाला नाही. परिणामी, उद्योग बंद असल्याने बेरोजगार झालेले कामगार गावाकडे गेले असून भविष्यात त्याचा फटका संपूर्ण उद्योग क्षेत्राला बसणार आहे.- के. आर. गोपी, अध्यक्ष, लघू उद्योजक संघटना

नवी मुंबईच्या एमआयडीसी क्षेत्रात सुमारे ४५०० मोठे उद्योग तर २००० च्या जवळपास छोटे उद्योग आहेत. त्यापैकी सुमारे २००० मोठे तर ३०० छोटे उद्योग सद्य:स्थितीला सुरू आहेत. उर्वरित उद्योग बंद असल्याने त्यांच्याशी संलग्न महावितरण, इंधन, वाहतूकदार यांनाही तोटा सहन करावा लागत आहे.

आशिया खंडातील सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र नवी मुंबईत आहे. दिघा येथून ते नेरुळपर्यंत हे क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्र व रहिवासी क्षेत्र अशा दोन भागांत नवी मुंबई विभागली आहे. या औद्योगिक क्षेत्रात छोटेमोठे असे सुमारे सहा हजार उद्योग आहेत. त्यानिमित्ताने सुमारे साडेतीन लाखांहून अधिक कामगार तिथे नोकरी करीत आहेत. मात्र मागील पाच वर्षांत काही मोठे उद्योग वेगवेगळ्या कारणांनी राज्याबाहेर हलविले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला घरघर लागलेली असतानाच कोरोनामुळे नवे संकट कोसळले आहे. या संकटातून तिथले सर्वच उद्योग पुन्हा उभे राहू शकतील का? याबाबतही शंका आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या