शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

एमआयडीसीपुढे उद्योग टिकविण्याचे आव्हान; निम्याहून अधिक कामगारांनी गाठले गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 00:35 IST

मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : लॉकडाउनमुळे नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रदेखील धोक्यात आले आहे. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम करणारे निम्म्याहून अधिक कामगार गावाकडे पळाले आहेत. त्यामुळे लॉकडाउननंतर उद्योग सुरू झाल्यास औद्योगिक क्षेत्राला पुन्हा उभारी मिळणे कठीण झाले आहे.

मुंबईसह नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यानंतरदेखील लॉकडाउन हटविला जाण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, मागील दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या चाकरमान्यांनीही गावाकडे धाव घेतली आहे. त्यामध्ये नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचाही समावेश आहे.

राज्याच्या विविध भागांतील तसेच परराज्यांतील हे कामगार आहेत. त्यांनी गाव गाठल्याचा धसका औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी घेतला आहे. वर्षानुवर्षे काम करणारे कामगार निघून गेल्याने, लॉकडाउननंतर पुन्हा उद्योग सुरू झाल्यास प्रशिक्षित कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याचा परिणाम उत्पादन निर्मितीवर पुढील वर्षभर होऊ शकतो. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची मागणी उद्योजकांच्या संघटनेने शासनाकडे केली होती; परंतु शासनाकडून केवळ अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती.

लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उद्योग वगळता सर्व उद्योग बंद आहेत. त्या ठिकाणचे कामगार गावी निघून गेल्यामुळे उद्योजकांना पुन्हा उद्योग सुरू करताना अडचण भासणार आहे. याचा मोठा फटका संबंधित व्यवसायासह शासनालादेखील बसणार आहे.- मंगेश ब्रह्मे, व्यवस्थापक, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज् असोसिएशन

उद्योग टिकविण्यासाठी कामगार टिकविणे गरजेचे होते. त्यानुसार कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती. परंतु सतत पाठपुरावा करूनदेखील ठोस निर्णय झाला नाही. परिणामी, उद्योग बंद असल्याने बेरोजगार झालेले कामगार गावाकडे गेले असून भविष्यात त्याचा फटका संपूर्ण उद्योग क्षेत्राला बसणार आहे.- के. आर. गोपी, अध्यक्ष, लघू उद्योजक संघटना

नवी मुंबईच्या एमआयडीसी क्षेत्रात सुमारे ४५०० मोठे उद्योग तर २००० च्या जवळपास छोटे उद्योग आहेत. त्यापैकी सुमारे २००० मोठे तर ३०० छोटे उद्योग सद्य:स्थितीला सुरू आहेत. उर्वरित उद्योग बंद असल्याने त्यांच्याशी संलग्न महावितरण, इंधन, वाहतूकदार यांनाही तोटा सहन करावा लागत आहे.

आशिया खंडातील सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र नवी मुंबईत आहे. दिघा येथून ते नेरुळपर्यंत हे क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्र व रहिवासी क्षेत्र अशा दोन भागांत नवी मुंबई विभागली आहे. या औद्योगिक क्षेत्रात छोटेमोठे असे सुमारे सहा हजार उद्योग आहेत. त्यानिमित्ताने सुमारे साडेतीन लाखांहून अधिक कामगार तिथे नोकरी करीत आहेत. मात्र मागील पाच वर्षांत काही मोठे उद्योग वेगवेगळ्या कारणांनी राज्याबाहेर हलविले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला घरघर लागलेली असतानाच कोरोनामुळे नवे संकट कोसळले आहे. या संकटातून तिथले सर्वच उद्योग पुन्हा उभे राहू शकतील का? याबाबतही शंका आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या