शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पोलिसांसमोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान - विद्यासागर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:53 IST

सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले.

कळंबोली : सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी ३०व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कोरेगाव-भीमा घटनेचा दाखला देत महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हातळली. महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होत आहे. याचे श्रेय पोलिसांनाही जाते. महाराष्ट्रातील लोकसंख्या ११ कोटींपेक्षा जास्त आहे. तुलनेत मनुष्यबळ अपुरे असले तीर पोलीस चांगले काम करीत असल्याचे राव यांनी सांगितले. हे युग तंत्रज्ञानाचे असल्याने स्मार्ट पोलिसांची गरज निर्माण झाली आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद संपविण्याकरिता महाराष्ट्र पोलीस प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांची मराठीतून सुरुवातराज्यपाल विद्यासागर राव यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नवीन वर्ष, तसेच मकरसक्र ांतीच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी विजेते संघ आणि स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेत पुरुषांच्या गटात राज्य राखीव पोलीस दलाने १४७ गुण तर महिलांमध्ये मुंबई पोलिसांनी ११८ गुण मिळून प्रथम क्र मांक पटकावला. मुंबई शहर पोलीस (पुरुष), कोल्हापूर परिक्षेत्र (महिला) द्वितीय क्र मांक मिळवला. तिसरा क्र मांक पुरुष गटात कोल्हापूर परिक्षेत्र आणि महिला गटात नवी मुंबई व कोकण परिक्षेत्राने पटकावला.नवी मुंबई व कोकण परिक्षेत्रातील राहुल काळे यांनी मैदान खेळात पुरुष गटात सर्वाधिक गुण मिळवत मोटारसायकल जिंकली. तर कोल्हापूर परिक्षेत्रातील जयश्री बोगरे हिने अव्वल गुणाची कमाई करीत स्कुटीची मानकरी ठरली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई