शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

पोलिसांसमोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान - विद्यासागर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:53 IST

सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले.

कळंबोली : सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी ३०व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कोरेगाव-भीमा घटनेचा दाखला देत महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हातळली. महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होत आहे. याचे श्रेय पोलिसांनाही जाते. महाराष्ट्रातील लोकसंख्या ११ कोटींपेक्षा जास्त आहे. तुलनेत मनुष्यबळ अपुरे असले तीर पोलीस चांगले काम करीत असल्याचे राव यांनी सांगितले. हे युग तंत्रज्ञानाचे असल्याने स्मार्ट पोलिसांची गरज निर्माण झाली आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद संपविण्याकरिता महाराष्ट्र पोलीस प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांची मराठीतून सुरुवातराज्यपाल विद्यासागर राव यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नवीन वर्ष, तसेच मकरसक्र ांतीच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी विजेते संघ आणि स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेत पुरुषांच्या गटात राज्य राखीव पोलीस दलाने १४७ गुण तर महिलांमध्ये मुंबई पोलिसांनी ११८ गुण मिळून प्रथम क्र मांक पटकावला. मुंबई शहर पोलीस (पुरुष), कोल्हापूर परिक्षेत्र (महिला) द्वितीय क्र मांक मिळवला. तिसरा क्र मांक पुरुष गटात कोल्हापूर परिक्षेत्र आणि महिला गटात नवी मुंबई व कोकण परिक्षेत्राने पटकावला.नवी मुंबई व कोकण परिक्षेत्रातील राहुल काळे यांनी मैदान खेळात पुरुष गटात सर्वाधिक गुण मिळवत मोटारसायकल जिंकली. तर कोल्हापूर परिक्षेत्रातील जयश्री बोगरे हिने अव्वल गुणाची कमाई करीत स्कुटीची मानकरी ठरली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई