शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान; नागरिकांमधील संवाद वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:24 IST

पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान; नागरिकांमधील संवाद वाढविण्याची गरज- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिस