शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
5
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
6
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
7
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
8
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
9
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
11
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
12
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
13
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
14
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
15
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
16
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
17
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
18
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
19
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
20
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान; नागरिकांमधील संवाद वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:24 IST

पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान; नागरिकांमधील संवाद वाढविण्याची गरज- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिस