शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान; नागरिकांमधील संवाद वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:24 IST

पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान; नागरिकांमधील संवाद वाढविण्याची गरज- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिस