शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांतिक संघटनांसह सामाजिक संस्थांवर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:20 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरामधील आठ लाख २५ हजार मतांवर शिवसेनेसह राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीत जास्त मते पारड्यामध्ये पाडून घेण्यासाठी प्रांतनिहाय संघटना, सामाजिक संस्था यांच्याही बैठका घेतल्या जात आहेत.राज्यातील सर्वाधिक २३ लाखांपेक्षा जास्त मतदार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. प्रमुख लढत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये असून, दोन्ही उमेदवार ठाणे शहरामधील आहेत, यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये प्रचाराविषयी अनुत्साहाचे वातावरण होते. प्रचारामधील मरगळ झटकून टाकण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे व राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी शहरात रॅली काढून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघांमध्ये एकूण आठ लाख २५ हजार १६६ मतदार आहेत. नवी मुंबईमधून कोणाला मताधिक्य मिळणार यावर निकाल अवलंबून असणार आहे. यामुळे येथून जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबविला जात आहे. देशाच्या व राज्यातील कानाकोपऱ्यामधून नागरिक येथे राहण्यासाठी आले आहेत. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांची भवन व सामाजिक संघटना शहरामध्ये कार्यरत असून, सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकणामधील नागरिकांच्या संघटनाही अस्तित्वात आहेत. निवडणुकांमुळे सामाजिक संस्था व प्रांतनिहाय संघटनांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राष्ट्रवादी व काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी वाशीमध्ये केरळ समाजामधील काही नागरिकांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. शिवसेना पदाधिकाºयांनी माथाडी भवनमध्ये मुस्लीम समाजामधील नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक प्रांत व समाजाची एकगठ्ठा मते मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध समाजाच्या पदाधिकाºयांच्या व नागरिकांच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत. नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठीचे आश्वासन दिले जात आहे. समाजासाठी भवन उभारण्यापासून ते विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी माथाडी कामगारांपासून विविध संघटनांच्या बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते. संस्था व संघटनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक संघटनांनी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यापेक्षा सर्वांचे स्वागत करून सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही एका पक्षाचे समर्थन करत असल्याचा ठपका बसू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.>प्रत्येक पक्षाचे सेल सक्रियनवी मुंबईमध्ये या पूर्वीच्या निवडणुकांमध्येही प्रांतिक व सामाजिक संघटनांना महत्त्व देण्यात आले होते. सर्वच राजकीय पक्षांकडे कोणत्या राज्यातील किती नागरिक नवी मुंबईमध्ये वास्तव्यासाठी आहेत. मतदार यादीचाही अभ्यास करून त्याप्रमाणे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक समाजाची एकगठ्ठा मतांसाठी शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही सेल तयार केले आहेत. शिवसेनेने नुकतेच उत्तर भारतीय समाजातील पदाधिकाºयांसाठी प्रशिक्षण शिबिराचेही आयोजित केले होते.>मतदारांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्ननवी मुंबईमध्ये राहणाºया अनेक नागरिकांची त्यांच्या गावाकडील मतदारसंघामध्येही मतदारयादीमध्ये नावे आहेत. विविध राज्यांमधील नागरिकांचेही त्यांच्या मूळगावाकडेही मतदारयादीमध्ये नाव आहे. ज्यांचे दोन ठिकाणी नाव नाही; परंतु गावाकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे गावाकडील नेत्यांकडून प्रचारासाठी बोलावले जात आहे, यामुळे मतदारांचे व कार्यकर्त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.>मताधिक्यासाठी रस्सीखेचनवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख २५ हजार मतदार आहेत. ऐरोली मतदारसंघात ४ लाख ४८ हजार ६८१ मतदार, बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७६ हजार ४८५ मतदार आहेत. गत निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघांमधून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये मिळालेले मताधिक्य टिकविण्याचे आव्हान या वेळी शिवसेनेसमोर असणार आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जबाबदारी आहे.