शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्ड न ठेवल्याने केंद्राने फटकारले

By admin | Updated: May 30, 2017 06:20 IST

केलेल्या कामाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नाही तर अथक परिश्रम घेऊन सुध्दा केलेल्या कामाला काहीच किंमत राहत नाही. असाच

आविष्कार देसाई /  लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : केलेल्या कामाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नाही तर अथक परिश्रम घेऊन सुध्दा केलेल्या कामाला काहीच किंमत राहत नाही. असाच काहीसा अनुभव रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी विभागाला आला आहे. नियमानुसार केलेल्या कामाचे फोटो वेबसाईटवर टाकण्यास ते कमी पडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्याचे फक्त २१ टक्केच काम पूर्ण झाल्याने केंद्र सरकारचे स्वच्छता मिशनचे आर्थिक सल्लागार समीर कुमार यांनी प्रशासनाला चांगलेच फटकारले आहे. प्रशासनाच्या या कासवछाप कामाला गती येणे गरजेचे झाले आहे.रायगड जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागावर सोपविण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानासाठीच या स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी त्यांना मनुष्यबळ आणि आवश्यकत्या तांत्रिक सुविधा सरकारने देऊ केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या विभागाला कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात येते. अभियान यशस्वी व्हावे यासाठी विविध कंपन्यांनी आपल्या सीएसआरमधून निधी दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जेएसडब्लू कंपनीचा फार मोठा वाटा आहे. जिल्ह्यात बांधण्यात आलेली शौचालये यांचा रेकॉर्ड ठेवण्याचे तसेच तो वेबसाईटवर टाकण्याचे काम स्वच्छता विभागालाच करावे लागते. ज्या ज्या ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे तेथील लाभार्थ्यांसह नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाचा फोटो वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. यासाठी संबंधित ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह पाणी व स्वच्छता मिशन विभागाची ही जबाबदारी आहे. २० आॅक्टोबर २०१४ ते २३ मे २०१७ या कालावधीत जिल्ह्यामध्ये तब्बल ८४ हजार ४९६ शौचालये बांधण्यात आली आहेत. पैकी १८ हजार ५०९ शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात प्रशासनाला यश आले आहे. फक्त २१ टक्केच काम झाले आहे. अद्यापही ६५ हजार ९८७ शौचालयांचे फोटो अपलोड करण्याचे काम बाकी आहे. मोठ्या प्रमाणात काम होऊनही ते रेकॉर्डवर न आल्याने केंद्र सरकारचे स्वच्छता मिशनचे आर्थिक सल्लागार समीर कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समीर कुमार हे गेल्याच आठवड्यात रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला होता. कामात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांना दिले होते.मोठ्या प्रमाणात काम होऊनही ते रेकॉर्डवर न आल्याने केंद्र सरकारचे स्वच्छता मिशनचे आर्थिक सल्लागार समीर कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समीर कुमार हे गेल्याच आठवड्यात रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला होता. जिल्ह्यामध्ये तब्बल ८४ हजार ४९६ शौचालये बांधण्यात आली आहेत. पैकी १८ हजार ५०९ शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र अद्यापही ६५ हजार ९८७ शौचालयांचे फोटो अपलोड करण्याचे काम बाकी आहे. यामुळे समीर कु मार यांनी नाराजी व्यक्त करु न अधिकाऱ्यांना फटकारले होते.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याने सर्वाधिक जास्त फोटो अपलोडचे काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत ५२.२७ टक्के काम केले आहे, तर कर्जत तालुक्याचे सर्वाधिक कमी म्हणजेच ३.७० टक्के काम झाले आहे.कामामध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना समीर कुमार यांनी केल्या आहेत. शौचालय बांधणीचे काम चांगल्या पध्दतीने झाले आहे. मात्र त्याचे फोटो अपलोड करण्यात मागे पडलो आहे. त्यामुळे आॅनलाइनला जिल्ह्याचे काम दिसून येत नाही. त्यामध्ये निश्चितच सुधारणा करण्यात येईल, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.