शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 13:00 IST

Navi Mumbai : रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात अनेक ठिकाणी हे कॅमेरे अद्यापही बसविले न गेल्याने भूमाफियांकडून खारफुटीची वारेमाप कत्तल सुरूच आहे.

- नारायण जाधव 

नवी मुंबई : महामुंबईतील खारफुटीची होणारी वारेमाप कत्तल रोखण्यासाठी वनविभागाने परिसरात २५० ठिकाणी सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात अनेक ठिकाणी हे कॅमेरे अद्यापही बसविले न गेल्याने भूमाफियांकडून खारफुटीची वारेमाप कत्तल सुरूच आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींत संताप व्यक्त होत आहे.

यासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. मुंबई शहरात ७०, मुंबई उपनगरात ७०, ठाण्यामध्ये ४०, भिवंडीमध्ये ३०, नवी मुंबईत ४० अशा २५० ठिकाणी हे तीन प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार होते.  सीसीटीव्हीमुळे खारफुटींवर होणारी आक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे थांबून पर्यावरणाचे रक्षण होईल,  असा विश्वास त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला होता. मात्र, अद्यापही हे कॅमेरे बसविले न गेल्याने नाराजी  व्यक्त होत आहे.

काेविड काळात खारफुटीवर अतिक्रमणकोविडच्या लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी खारफुटी झाडांची कत्तल करण्यात आली होती. ठाण्यातील  मुंब्रा आणि दिवा शहराला जोडणारा मुंब्रा चुहा पूल ते दिवा येथील साबेगावपर्यंत दोन किलोमीटर लांबीचा रस्ता खारफुटी कापून भूमाफियांनी तयार केल्याचा गंभीर प्रकारही समोर आला होता, तर नवी मुंबईत एनआरआय कॉम्प्लेक्ससह जेएनपीटी, उरण, खारघर परिसरात वेटलँड अर्थात अनेक पाणथळीच्या जागांवर भराव टाकून  अतिक्रमणे केल्याचे उघडकीस आले आहे.

१८ हजार खारफुटीवर वॉच ठेवणार कसाभारतीय वनसर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या ६,६०० हेक्टर कांदळवनक्षेत्र आहे. त्यापैकी २७६ हेक्टर हे मुंबई शहरात असून, उपनगरामध्ये ३,९४८.४ हेक्टर राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. यातील ३,७०६.४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. उर्वरित २४२ हेक्टर क्षेत्र एमएमआरडीए, एमआयडीसी, म्हाडा यांच्या मालकीचे आहे. वन विभागाच्या माहितीनुसार सिंधदुर्ग, रायगड, ठाणे आणि अंधेरी, बोरीवलीत १,३८६ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याशिवाय नुकतेच रायगड, ठाणे जिल्ह्यांतील १०२२ हेक्टर खारफुटी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन बरेच दिवस झाले. मात्र, त्यांची निविदा प्रक्रियाही अद्याप सुरू  केलेली नाही. हा निर्णय चांगला असला तरी जे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, ते हायरिझॉल्यूशनचे हवेत. शिवाय त्यासाठी अद्ययावत कंट्रोल रूम हवी. सध्या पुनर्विकासातून जे डेब्रिज बाहेर पडत आहे, ते भूमाफिया खारफुटीवर टाकून अतिक्रमण करून घरे, गोदामे बांधत आहेत. यावरही नियंत्रण हवे.- बी. एन. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाउंडेशन

खारफुटी संवर्धन आणि संरक्षणासाठी जे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, त्यासाठी वनविभागाने  प्रकल्प व्यवस्थापकाची नेमणूक करून त्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्याकडून आलेल्या तांत्रिक अहवालानुसार निविदा मागवून उच्चप्रतीचे कॅमेरे नेमून दिलेल्या ठिकाणी  बसविण्यात येतील.   - आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, कांदळवन, संधारण घटक, मुंबई

टॅग्स :cctvसीसीटीव्हीNavi Mumbaiनवी मुंबई