शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यात कॅन्सर रुग्णालयांची आवश्यकता - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:40 IST

कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टाटा रुग्णालय अपुरे पडत असल्याने अशा इतरही अनेक रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई : कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टाटा रुग्णालय अपुरे पडत असल्याने अशा इतरही अनेक रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सानपाडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी जैन संत पद्मसागर महाराज यांच्या कार्याचे कौतुक करत संतांच्या सान्निध्यात राहिल्याने तेज मिळत असल्याची भावना व्यक्त केली.मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये प्रतिदिन मोठ्या संख्येने कॅन्सरने पीडित असलेल्या रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार केले जातात. यामुळे देशभरातून कॅन्सरचे रुग्ण त्या ठिकाणी येतात. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यानंतरही हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून होणारे नियोजन स्तुत्य असून, त्यावर मॅनेजमेंटचा कोर्स होऊ शकतो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सानपाडा येथे व्यक्त केली. राज्यातील इतर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता मुख्यमंत्री साहाय्यता निधी सुरू करण्यात आलेला आहे. गरिबांना आरोग्यसेवेत सुविधेची व्याप्ती अधिक वाढवत नुकतीच महात्मा फुले जनाधार योजना सुरू केल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी जैन संत पद्मसागर महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. पद्मसागर महाराज यांनी लोकांना सेवेसाठी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक जण विविध क्षेत्रात समाजकार्य करत आहेत. आपल्यालाही महाराजांच्या आशीर्वादाने चांगल्या कार्याची प्रेरणा मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. संतांनी केवळ त्यागच केलेला असल्याने, त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर तेज मिळते, असे उद्गार काढत त्यांनी पद्मसागर महाराजांची प्रशंसा केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल