शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

राज्यात कॅन्सर रुग्णालयांची आवश्यकता - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:40 IST

कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टाटा रुग्णालय अपुरे पडत असल्याने अशा इतरही अनेक रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई : कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टाटा रुग्णालय अपुरे पडत असल्याने अशा इतरही अनेक रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सानपाडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी जैन संत पद्मसागर महाराज यांच्या कार्याचे कौतुक करत संतांच्या सान्निध्यात राहिल्याने तेज मिळत असल्याची भावना व्यक्त केली.मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये प्रतिदिन मोठ्या संख्येने कॅन्सरने पीडित असलेल्या रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार केले जातात. यामुळे देशभरातून कॅन्सरचे रुग्ण त्या ठिकाणी येतात. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यानंतरही हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून होणारे नियोजन स्तुत्य असून, त्यावर मॅनेजमेंटचा कोर्स होऊ शकतो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सानपाडा येथे व्यक्त केली. राज्यातील इतर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता मुख्यमंत्री साहाय्यता निधी सुरू करण्यात आलेला आहे. गरिबांना आरोग्यसेवेत सुविधेची व्याप्ती अधिक वाढवत नुकतीच महात्मा फुले जनाधार योजना सुरू केल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी जैन संत पद्मसागर महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. पद्मसागर महाराज यांनी लोकांना सेवेसाठी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक जण विविध क्षेत्रात समाजकार्य करत आहेत. आपल्यालाही महाराजांच्या आशीर्वादाने चांगल्या कार्याची प्रेरणा मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. संतांनी केवळ त्यागच केलेला असल्याने, त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर तेज मिळते, असे उद्गार काढत त्यांनी पद्मसागर महाराजांची प्रशंसा केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल