शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पनवेलमध्ये १३ हजार परवाने रद्द, परिवहन विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:54 IST

वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने कडक धोरण राबविण्यास सुरु वात केली आहे.

पनवेल  - वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने कडक धोरण राबविण्यास सुरु वात केली आहे. दोन महिन्यांत सुमारे १३ हजार चालकांचे परवाने रद्द केल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी कळंबोलीत शुक्रवारी पार पडलेल्या ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी दिली.राज्यात ३० वर्षांपासून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी आम्ही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो. अपघातांची संख्या कमी करण्याचा आमचा उद्देश असला तरी गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढल्याचे चन्ने यांनी सांगितले. सिग्नल तोडणे, मद्यपान करून वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे यासारख्या विविध गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. कारवाईत ९० दिवसापर्यंत परवाने रद्द करण्यात आले आहेत. रस्ते अपघाताचा परिणाम देशाच्या जीडीपीवर होतो. अपघातांमुळे देशाचा तीन टक्के जीडीपी दर कमी होत असल्याचे चन्ने यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाला वाहतूक नियमांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची विनंती परिवहन विभागाने केली आहे.कळंबोली येथील अभियानात अभिनेते वैभव मांगले यांनीदेखील वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सर्वांना केले. सध्याच्या घडीला सामाजिक भान हा महत्त्वाचा घटक आहे. पालक जेव्हा दुचाकी किंवा कारने पाल्याला शाळेत सोडायला येतात, तेव्हा त्यांनी हेल्मेट व सीटबेल्ट लावणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांवर नकळत संस्कार होतात. ज्याप्रमाणे आपण घराची निगा राखतो, तशीच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, असे मार्गदर्शन मांगले यांनी केले.कळंबोली येथील सुधागड हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्र माला वाहतूक पोलिसांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.यामध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त सुनील लोखंडे आदी उपस्थित होते.अबोली रिक्षा व बाईक रॅलीकळंबोलीतील जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कळंबोली सुधागड हायस्कूल या ठिकाणाहून ४० पेक्षा जास्त अबोली रिक्षाचालक महिला व दुचाकी रॅली या वेळी काढण्यात आली. हेल्मेट जनजागृती व वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी