शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?

By अतुल कुलकर्णी | Updated: December 15, 2025 05:43 IST

सुविधा अधिक, पण राज्याला फायदा काय?

'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग-१अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण झाल्यामुळे मुंबईची एक आणि नवी मुंबईत एक अशा दोन धावपट्टधा (रनवे) उपलब्ध झाल्या आहेत. नवी मुंबईला काही दिवसांनी आणखी एक धावपट्टी उपलब्ध होईल. त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विमानतळावरून मुंबईला येण्यासाठी सकाळचे विमान मिळेल का? हा कळीचा प्रश्न असेल. नवी मुंबई विमानतळावरून नेमकी कोणती उड्डाणे होणार, याविषयी अजूनही स्पष्टता नसल्यामुळे सगळीकडे संभ्रमाचे वातावरण आहे.

नागपूर, औरंगाबाद यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग (चिपी), सोलापूर, अकोला, अमरावती, नांदेड, शिर्डी आणि पुणे एवढी विमानतळे चालू स्थितीत आहेत. त्याशिवाय यवतमाळ, लातूर, नाशिक, जळगाव ही विमानतळे मुंबईत येण्यासाठी योग्य वेळा उपलब्ध झाल्या तर चालू होऊ शकतात. या सर्व शहरांमधून मुंबईला सकाळच्या वेळेला येणे आणि संध्याकाळी, रात्री त्या त्या शहरात परत जाता आले तर महाराष्ट्रातले अनेक जिल्हे विमान वाहतुकीच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी राज्य शासनाने मुंबईत येणाऱ्या विमानांसाठी सकाळच्या वेळा आग्रहाने घेतल्या पाहिजेत.

मुंबईत एकच आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि क्रॉस आकाराची एकच धावपट्टी असल्यामुळे सकाळच्या वेळी विमान येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेळेची मारामार असते. आंतरराष्ट्रीय विमानांना पहाटेपासूनच्या वेळा दिल्यामुळे त्या वेळेत बदल करता येत नाही. शिवाय मुंबई विमानतळावरच कार्गो विमानांचे स्लॉटही देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतून प्रादेशिक विमान वाहतुकीला खूप मर्यादा आहेत. नवी मुंबईत दोन धावपट्ट्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत उतरून राज्यात किंवा राज्याबाहेर अन्य शहरांमध्ये जातात. त्यातील तीस ते पस्तीस टक्के प्रवासी मुंबईत उतरतात, थांबतात, असा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांचे आगमन जर नवी मुंबई विमानतळावर झाले तर तेवढे स्लॉट मुंबईत राज्यातल्या राज्यात वाहतुकीसाठी देता येतील, असे या क्षेत्रातल्या जाणकारांचे मत आहे.

उडान योजनेचा फायदा महाराष्ट्राला मिळेल का?

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधील इंदोर, भोपाळ आणि गोवा एवढा भाग विमानतळ प्राधिकरणांतर्गत पश्चिम विभागात येतो. केंद्र सरकारची उडान योजना विभागानुसार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सबसिडीदेखील देऊ केली आहे. नवे विमानतळ आणि मिळणारी सबसिडी यांना एकत्र करून राज्यांतर्गत विमान वाहतूक वाढवण्याचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या अनेक विमानतळांना त्याचा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना (एअर स्ट्रीप) धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग या उडान योजनेत घेता येऊ शकतो. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत आहे.

सकाळच्या वेळा सरकारने मागून घेतल्या पाहिजेत

१. मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे प्रवासी मुंबईत येतात आणि इथून अन्य ठिकाणी कनेक्टिंग फ्लाइट घेतात. अशा प्रवाशांना नवी मुंबईतून कनेक्टिंग फ्लाइट घेतले तर फारसा फरक पडत नाही.

२. अशी विमाने जर नवी मुंबईतून जाऊ लागली, तर त्यांच्या वेळा ही राज्यांतर्गत वाहतुकीसाठी मुंबईत उपलब्ध होतील. नवी मुंबई विमानतळासाठी जागा देण्यापासून सगळ्या गोष्टी राज्य शासनाने केल्या आहेत.

३. त्यामुळे सकाळच्या वेळा राज्यांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकारने अधिकारवाणीने मागून घेतल्या पाहिजेत, असे कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport: Morning access to Mumbai possible? Evening return?

Web Summary : Navi Mumbai airport offers potential for increased regional connectivity. Prioritizing morning slots for state flights is crucial. Utilizing 'UDAN' scheme, connecting existing airstrips would boost Maharashtra's air travel.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ