शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये प्रचाराची धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 23:17 IST

प्रत्येक नोडमध्ये रॅली : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांची धावपळ; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

नवी मुंबई : प्रचारासाठी शेवटचा रविवार असल्यामुळे नवी मुंबईसह, पनवेल, उरणमध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला होता. सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक नोडमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. घरोघरी जाऊन कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत होते.

ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण मतदारसंघामध्ये रविवारी सकाळीपासून रॅली व सभांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघांमध्ये आठ लाख ४६ हजार मतदार आहेत. शहरवासी दिवसभर नोकरी, व्यावसायानिमित्त घराबाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रविवार हा एकच दिवस भेटत असतो. शेवटचा रविवार असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करा, अशा सूचना उमेदवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. कार्यकर्त्यांनी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये जाऊन पत्रके वाटण्यास सुरुवात केली होती. अनेक घरांमध्ये तीन ते चार पक्षांचे कार्यकर्ते एकाच दिवशी पोहोचल्याचेही पाहावयास मिळत होते.

राष्ट्रवादी काँगे्रसने रॅलींसह सानपाडा व ऐरोलीमध्ये अमोल मिटकरी यांच्या सभांचे आयोजन केले होते. भाजपच्या वतीने ऐरोली मतदारसंघामध्ये कोपरखैरणे गाव, प्रभाग ४६, ४७, ४५, ३७ व ३८ मध्ये उमेदवार गणेश नाईक यांनी रॅली काढली.बेलापूर मतदारसंघामध्ये मंदा म्हात्रे यांच्या नेरुळ परिसरामध्ये रॅलीचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या रॅलींमुळे नवी मुंबईमधील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले होते.

उरण मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांना गावांमध्ये जाऊन प्रचार करा, अशा सूचना दिल्या होत्या. उरण मतदारसंघ खालापूर तालुक्यातील चौकपर्यंत पसरला आहे. यामुळे उमेदवारांची सर्व मतदारांपर्यंत जाण्यासाठी धावपळ होत आहे. नवी मुुंबई, पनवेल व उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये सातारा व इतर मतदारसंघांमधील उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये सातारा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. जावली तालुक्यामधील कार्यकर्त्यांशीसंवाद साधण्यासाठी ही सभा आयोजित केली होती.मतदारांना गावाकडेयेण्याचे आवाहनसातारा मतदारसंघातील भाजप उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी व सातारा तालुक्यामधील मतदारांशी संवाद साधला. ज्या मुंबई, नवी मुंबईकरांचे गावाकडील मतदारसंघात नाव आहे त्यांनी मतदानासाठी गावाकडे येण्याचे आवाहन केले. रविवारी कोरेगाव, वाई, माण व इतर मतदारसंघामधील पदाधिकाऱ्यांनीही नवी मुंबईमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांना गावाकडे येण्याचे आवाहन केले.नेत्यांच्या आदेशामुळे प्रचारामध्ये उत्साहबेलापूर मतदारसंघामध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक मंदा म्हात्रे यांचा प्रचार करणार का? याविषयी तर्क-वितर्क लढविले जात होते; परंतु नाईकांनी ताकदीने प्रचारामध्ये उतरण्याचे आदेश सर्व पदाधिकाºयांना दिले आहेत. यामुळे रॅलीमध्ये नवे, जुने सर्व भाजप पदाधिकारी सहभागी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

कार्यकर्ते समोरासमोररविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती, यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर येत होते. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा प्रचार करणारे अनेक जण या वेळी भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांचे काही सहकारी राष्ट्रवादीमध्ये आहेत, यामुळे गतवेळी एकाच उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले पदाधिकारी या वेळी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, असे चित्र नेरुळ, सारसोळे, सीवूडमध्ये पाहावयास मिळत होते.बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्नच्माने यांना माघार घेऊन भाजपला पाठिंबा देण्यासाठी मन वळविण्यात आले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेत्यांची त्यांच्याशी संवाद साधला असून आता माने सोमवारी नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पनवेलमध्ये ग्रामीण भागात प्रचारावर जोरपनवेल : पनवेल मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रचारावर भाजपने जोर दिला आहे. ग्रामीण भागात शेकापचा पारंपरिक मतदार असल्याने भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन केल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन रविवारी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार दौºयादरम्यान केले. भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पालीदेवद, देवद, विचुंबे, वळवली, टेंभोडे, नेवाळी, आदई असा प्रचारदौरा होता. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पनवेल विधानसभा मतदारसंघातशहरी भागात भाजपची एकहाती सत्ता आहे.

पनवेल महानगरपालिकेतभाजपचे सर्वात जास्त नगरसेवकशहरी भागातून निवडून आलेआहेत. मात्र, ग्रामीण भागातशेकापचे वर्चस्व असल्याने ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून ग्रामीण भागातही भाजपला मताधिक्य मिळवून देण्याच्या प्रयत्नाने भाजपने प्रचाराचा जोर वाढविला आहे.या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, सरचिटणीस प्रल्हाद केणी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागीझाले होते.

टॅग्स :panvel-acपनवेल