शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 03:06 IST

बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समन्वय समितीचे पदाधिकारी व माथाडी नेते यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलने होत आहेत. अशातच सोमवारी औरंगाबाद येथे मोर्चादरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तर मंगळवारी राज्याच्या अनेक भागात बंद पुकारल्यानंतर बुधवारी मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी एपीएमसी येथे मराठा समन्वय समितीसह माथाडी नेते, कामगार यांच्यात बैठक झाली. त्यास आमदार नरेंद्र पाटील, प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, मराठा समन्वय समितीचे अंकुश कदम, मोहन पाडळे, सूरज बर्गे, नीलेश मोरवे, विजय खोपडे, जितेंद्र येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत बुधवार, २५ जुलै रोजी नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय सर्वमताने घेण्यात आला. हा बंद मराठा आरक्षणाच्या मागणीसह मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी केला जाणार असल्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर बैठकीदरम्यान कै. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात आले. मात्र, बंदमधून शाळा, महाविद्यालये यासह भाजी मार्केट व रुग्णालये अशा अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे.अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी सरकार गांभीर्याने घेत नसल्याने राज्यभर आंदोलने होत आहेत. त्यानंतरही केवळ आरक्षणाचे पोकळ आश्वासन देऊन समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत आहे. यामुळे जनतेमध्ये सरकारविषयी तेढ निर्माण झालेली असून, आरक्षणाच्या मागणीकरिता निघणाऱ्या आंदोलनामधून ती उमटत आहे. परंतु नवी मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यानुसार पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. शहरातील महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानके, बस डेपो याठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त लावला जाणार आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNavi Mumbaiनवी मुंबई