शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 03:06 IST

बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समन्वय समितीचे पदाधिकारी व माथाडी नेते यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलने होत आहेत. अशातच सोमवारी औरंगाबाद येथे मोर्चादरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तर मंगळवारी राज्याच्या अनेक भागात बंद पुकारल्यानंतर बुधवारी मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी एपीएमसी येथे मराठा समन्वय समितीसह माथाडी नेते, कामगार यांच्यात बैठक झाली. त्यास आमदार नरेंद्र पाटील, प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, मराठा समन्वय समितीचे अंकुश कदम, मोहन पाडळे, सूरज बर्गे, नीलेश मोरवे, विजय खोपडे, जितेंद्र येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत बुधवार, २५ जुलै रोजी नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय सर्वमताने घेण्यात आला. हा बंद मराठा आरक्षणाच्या मागणीसह मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी केला जाणार असल्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर बैठकीदरम्यान कै. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात आले. मात्र, बंदमधून शाळा, महाविद्यालये यासह भाजी मार्केट व रुग्णालये अशा अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे.अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी सरकार गांभीर्याने घेत नसल्याने राज्यभर आंदोलने होत आहेत. त्यानंतरही केवळ आरक्षणाचे पोकळ आश्वासन देऊन समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत आहे. यामुळे जनतेमध्ये सरकारविषयी तेढ निर्माण झालेली असून, आरक्षणाच्या मागणीकरिता निघणाऱ्या आंदोलनामधून ती उमटत आहे. परंतु नवी मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यानुसार पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. शहरातील महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानके, बस डेपो याठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त लावला जाणार आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNavi Mumbaiनवी मुंबई