शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

आरोपीच्या अटकेसाठी पिंजले शेत; तुर्भे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:47 IST

अत्याचार करून काढला होता पळ

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळालेल्या व्यक्तीला पोलिसांनी दोन दिवसांत मंगळवारी शिताफीने अटक केली आहे. त्याच्या अटकेसाठी उस्मानाबाद येथील होळी गावातली उसाची शेते पिंजून काढावी लागली. अत्याचार केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावून तो गावी पळाला होता.विजय राठोड असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो तुर्भे एमआयडीसी परिसरात राहणारा असून, मूळचा उस्मानाबादचा आहे. रविवारी दुपारी त्याने तुर्भे स्टोअर परिसरातल्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. ही मुलगी त्याच्या घरासमोरून जात असताना, त्याने मुलीला ओढत घरात नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केले, शिवाय पोलिसांकडे तक्रार न करण्याची धमकी तिच्या कुटुंबीयांना दिली होती. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत, गुन्हा दाखल झाला होता. राठोडने कारवाईच्या भीतीने शहरातून पळ काढला होता. यामुळे त्याच्या अटकेसाठी परिमंडळ एकचे उपायुक्त सुरेश मेंगडे व सहायक आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सचिन राणे यांनी सहायक निरीक्षक दीपक डोंब, पवन नांद्रे, उपनिरीक्षक अर्चना गाढवे, हवालदार शत्रुघ्न मावळे, दिनेश मोरे, सुमित सरगर यांचे पथक तयार केले होते. या दरम्यान, राठोड सानपाडा येथून खासगी बसने पुण्याच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानुसार, तपास पथकाने माहिती काढली असता, तो उस्मानाबादला गेल्याचे समोर आले. यामुळे त्याच्या अटकेसाठी हवालदार दिनेश मोरे, रवी पवार व विकास शिंगाडे हे उस्मानाबादला रवाना झाले, परंतु तिथेही तो ठिकाणे बदलत होता.पोलिसांची कारवाईअखेर मंगळवारी तो होळी गाव येथे असल्याची माहिती मिळाली असता, पथक त्या ठिकाणी गेले असता, राठोड उसाच्या शेतात लपला होता. यावेळी त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी परिसरातली सगळी उसाची शेते पिंजून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.