शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोडतीदरम्यान सिडकोत रंगले मानापमान नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 03:13 IST

निमंत्रणाचा वाद : विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ; युनियनच्या पदाधिकाऱ्यांचीही दांडी

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पाची मंगळवारी सोडत संपन्न झाली, त्यासाठी सिडकोने प्रथमच सगंणकीय प्रणालीचा अवलंब केला. सोडतीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली असली, तरी कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून मात्र सिडकोत वेगळेच नाट्य रंगले आहे. याचा परिणाम म्हणून सिडकोच्या अनेक वरिष्ठ अधिकाºयांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. सिडकोच्या इतिहासात असा मानापमानाचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने अधिकारी वर्गात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सिडकोच्या माध्यमातून आर्थिक व अल्प उत्पन्न गटासाठी १४ हजार ८३८ घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेतील घरांसाठी मंगळवारी सिडको भवनमध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीची संपूर्ण जबाबदारी पणन विभागाची होती; परंतु या विभागाच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेचा फटका कार्यक्रमाच्या नियोजनाला बसला. ज्या विभागाचा कार्यक्रम असेल, त्या विभागाकडून संबंधित व इतर विभाग अधिकाºयांना निमंत्रण देणे ही सिडकोची आजपर्यंतची परंपरा आहे; परंतु मंगळवारच्या कार्यक्रमाने या परंपरेला छेद दिल्याचे दिसून आले आहे. पणन विभागाकडून कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत एकाही वरिष्ठ अधिकाºयाला निमंत्रण दिले गेले नाही. इतकेच नव्हे, तर या गृहप्रकल्पाशी संबंधित नियोजन आणि अभियंता विभागालाही विश्वासात घेतले गेले नसल्याचे समजते. याचा परिणाम म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या या गृहप्रकल्पाच्या सोडतीला वरिष्ठ अधिकाºयांनी अनुपस्थिती दर्शविली. तसेच युनियनचे पदाधिकारीही गैरहजर राहिले होते. विशेष म्हणजे, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांनीही कार्यक्रमाला येणे टाळले. खासदार व स्थानिक आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचा सिडकोत पायंडा आहे. मात्र, त्यालाही या वेळी खो दिल्याचे दिसून आले आहे.व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुखांना विश्वासत घेवूनच कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. कार्यक्रमाची जबाबदारी पणन आणि जनसंपर्क विभागावर होती. त्यानुसार अगदी नियोजनबध्द पध्दतीने सोडत प्रक्रिया पार पडली.- लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडकोजनसंपर्क विभागाच्या मर्यादाया कार्यक्रमाच्या माध्यमातून सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. विविध टप्प्यावर या विभागाचा अनुभव कमी पडत असल्याचे पाहावयास मिळाले. वास्तविकपणे बाह्य पाहुण्यांना निमंत्रित करण्याची जबाबदारी जनसंपर्क विभागाची असते. शिवाय, कार्यक्रमाच्या वेळी पाहुण्यांचे चहापान आणि इतर सुविधा पुरविण्याचे कामही जनसंपर्क विभागामार्फत होते. प्रोटोकॉल जपण्याची मोठी जबाबदारी या विभागाला हाताळावी लागते. दुर्दैवाने मंगळवारच्या सोडती दरम्यान, या सर्व गोष्टींचा प्रकर्षाने अभाव जाणवला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई