शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोबी, फ्लॉवर, टोमॅटोसह पालेभाज्यांचीही आज टंचाई; बाजार समितीतील बंदमुळे मुंबईकरांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 05:22 IST

भाज्या, पालेभाज्यांच्या गाड्या बाजार समितीत न पोहोचल्याने मुंबईकरांना शुक्रवारीही भाज्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई :  माथाडी कामगारांनी पुकारलेला गुरुवारचा बंद मागे घेतला खरा, पण त्याची माहिती वेळेत शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनेक भाज्या, पालेभाज्यांच्या गाड्या बाजार समितीत न पोहोचल्याने मुंबईकरांना शुक्रवारीही भाज्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. 

कोबी, फ्लॉवर, टाेमॅटो, गवार, दोडका यांच्या खूप कमी गाड्या आल्या. शिवाय आवळा, बीट, घेवडा, कारली, तोंडली यांची आवकच झाली नाही. मेथीची आवक कमी झाली, तर पालक, पुदिना, शेपूसारख्या पालेभाज्या आल्या नाहीत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने फळांची आवक सध्या वाढली आहे. 

माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या विधेयकाविरोधात राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी १४ डिसेंबरला एक दिवसाच्या बंदची घोषणा केली होती. बुधवारी, १३ डिसेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर कामगार संघटनांनी बंद मागे  घेतला. पण, त्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही. यामुळे गुरुवारी मार्केट सुरू असूनही अवघी ३५ टक्के आवक झाली. फारसे ग्राहकही मार्केटकडे फिरकले नाहीत.

बाजारभाव जैसे थे

पुरेशी आवक नसल्यामुळे कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती.

आवक कमी झाली असली, तरी बाजारभावांवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शुक्रवारी मार्केट सुरळीत सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्केटनिहाय दोन दिवसांमधील वाहनांचा तपशील

मार्केट   १३ डिसें.        १४ डिसें.

भाजीपाला       ६७६    १८६

फळ मार्केट      ३३४    ७९

धान्य   २५२    १४७

कांदा-बटाटा     २४८    ४१

मसाला १७८    १४७

कांदा २९ रुपयांवर

बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. बुधवारी १,५६४ टन कांद्याची आवक झाली होती. घाऊक बाजारात त्याला २३ ते ३६ रुपये दर मिळाला होता. गुरुवारी २०० टनच आवक झाली असून, बाजारभाव १९ ते २९ वर आला आहे. शासनाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ही घसरण सुरू आहे.