शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कोबी, फ्लॉवर, टोमॅटोसह पालेभाज्यांचीही आज टंचाई; बाजार समितीतील बंदमुळे मुंबईकरांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 05:22 IST

भाज्या, पालेभाज्यांच्या गाड्या बाजार समितीत न पोहोचल्याने मुंबईकरांना शुक्रवारीही भाज्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई :  माथाडी कामगारांनी पुकारलेला गुरुवारचा बंद मागे घेतला खरा, पण त्याची माहिती वेळेत शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनेक भाज्या, पालेभाज्यांच्या गाड्या बाजार समितीत न पोहोचल्याने मुंबईकरांना शुक्रवारीही भाज्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. 

कोबी, फ्लॉवर, टाेमॅटो, गवार, दोडका यांच्या खूप कमी गाड्या आल्या. शिवाय आवळा, बीट, घेवडा, कारली, तोंडली यांची आवकच झाली नाही. मेथीची आवक कमी झाली, तर पालक, पुदिना, शेपूसारख्या पालेभाज्या आल्या नाहीत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने फळांची आवक सध्या वाढली आहे. 

माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या विधेयकाविरोधात राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी १४ डिसेंबरला एक दिवसाच्या बंदची घोषणा केली होती. बुधवारी, १३ डिसेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर कामगार संघटनांनी बंद मागे  घेतला. पण, त्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही. यामुळे गुरुवारी मार्केट सुरू असूनही अवघी ३५ टक्के आवक झाली. फारसे ग्राहकही मार्केटकडे फिरकले नाहीत.

बाजारभाव जैसे थे

पुरेशी आवक नसल्यामुळे कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती.

आवक कमी झाली असली, तरी बाजारभावांवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शुक्रवारी मार्केट सुरळीत सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्केटनिहाय दोन दिवसांमधील वाहनांचा तपशील

मार्केट   १३ डिसें.        १४ डिसें.

भाजीपाला       ६७६    १८६

फळ मार्केट      ३३४    ७९

धान्य   २५२    १४७

कांदा-बटाटा     २४८    ४१

मसाला १७८    १४७

कांदा २९ रुपयांवर

बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. बुधवारी १,५६४ टन कांद्याची आवक झाली होती. घाऊक बाजारात त्याला २३ ते ३६ रुपये दर मिळाला होता. गुरुवारी २०० टनच आवक झाली असून, बाजारभाव १९ ते २९ वर आला आहे. शासनाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ही घसरण सुरू आहे.