शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोबी, फ्लॉवर, टोमॅटोसह पालेभाज्यांचीही आज टंचाई; बाजार समितीतील बंदमुळे मुंबईकरांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 05:22 IST

भाज्या, पालेभाज्यांच्या गाड्या बाजार समितीत न पोहोचल्याने मुंबईकरांना शुक्रवारीही भाज्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई :  माथाडी कामगारांनी पुकारलेला गुरुवारचा बंद मागे घेतला खरा, पण त्याची माहिती वेळेत शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनेक भाज्या, पालेभाज्यांच्या गाड्या बाजार समितीत न पोहोचल्याने मुंबईकरांना शुक्रवारीही भाज्यांच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. 

कोबी, फ्लॉवर, टाेमॅटो, गवार, दोडका यांच्या खूप कमी गाड्या आल्या. शिवाय आवळा, बीट, घेवडा, कारली, तोंडली यांची आवकच झाली नाही. मेथीची आवक कमी झाली, तर पालक, पुदिना, शेपूसारख्या पालेभाज्या आल्या नाहीत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने फळांची आवक सध्या वाढली आहे. 

माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या विधेयकाविरोधात राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी १४ डिसेंबरला एक दिवसाच्या बंदची घोषणा केली होती. बुधवारी, १३ डिसेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर कामगार संघटनांनी बंद मागे  घेतला. पण, त्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही. यामुळे गुरुवारी मार्केट सुरू असूनही अवघी ३५ टक्के आवक झाली. फारसे ग्राहकही मार्केटकडे फिरकले नाहीत.

बाजारभाव जैसे थे

पुरेशी आवक नसल्यामुळे कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती.

आवक कमी झाली असली, तरी बाजारभावांवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शुक्रवारी मार्केट सुरळीत सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्केटनिहाय दोन दिवसांमधील वाहनांचा तपशील

मार्केट   १३ डिसें.        १४ डिसें.

भाजीपाला       ६७६    १८६

फळ मार्केट      ३३४    ७९

धान्य   २५२    १४७

कांदा-बटाटा     २४८    ४१

मसाला १७८    १४७

कांदा २९ रुपयांवर

बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. बुधवारी १,५६४ टन कांद्याची आवक झाली होती. घाऊक बाजारात त्याला २३ ते ३६ रुपये दर मिळाला होता. गुरुवारी २०० टनच आवक झाली असून, बाजारभाव १९ ते २९ वर आला आहे. शासनाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ही घसरण सुरू आहे.