शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या वातानुकूलित मुख्यालयाचा तिजोरीवर भार

By admin | Updated: June 21, 2017 05:49 IST

पामबीच रोडवरील महापालिकेचे वातानुकूलित भव्य मुख्यालय पांढरा हत्ती ठरू लागले आहे. प्रत्येक महिन्याला २५ ते ३५ लाख रुपये वीज बिल भरावे लागत आहे. डि

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पामबीच रोडवरील महापालिकेचे वातानुकूलित भव्य मुख्यालय पांढरा हत्ती ठरू लागले आहे. प्रत्येक महिन्याला २५ ते ३५ लाख रुपये वीज बिल भरावे लागत आहे. डिसेंबर २०१३ पासून मे २०१७ पर्यंत तब्बल १० कोटी २५ लाख रूपये वीज बिलावर खर्च झाले आहेत. अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींना वातानुकूलित सुविधा देण्यासाठी पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकला जात असून ही उधळपट्टी थांबविण्याची मागणी होवू लागली आहे.नवी मुंबई महापालिकेने २०० कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करून पामबीच रोडवर भव्य मुख्यालय उभारले आहे. देशातील महापालिकेची सर्वात आलिशान इमारत म्हणूनही तिची ओळख निर्माण होत आहे. वास्तविक सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा कमीत कमी वापर होणे आवश्यक असते. इमारतीची रचना करताना त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश येईल याची दक्षता घेणे आवश्यक असते. परंतु महापालिका मुख्यालयाची रचना करताना या सर्वांचा विसर पडला आहे. इमारतीमध्ये विद्युत दिवे बंद असल्यास काम करणे शक्यच नाही. पूर्ण इमारतीमध्ये सेंट्रल ए. सी. बसविण्यात आली आहे. सात मजली इमारतीमध्ये कुठेही पंखा नाही. पूर्ण इमारतच वातानुकूलित असल्याने वीज बिलावर प्रचंड खर्च होत आहे. जुईनगरमधील नगरसेविका तनुजा श्रीधर मढवी यांनी सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. दोन वर्षांमध्ये मनपा मुख्यालयासाठी किती वीज वापरण्यात आली असून त्यासाठी किती खर्च झाला याविषयी विचारणा केली होती.महापालिका मुख्यालयाला डिसेंबर २०१३ पासून विद्युत व्यवस्था कार्यरत करण्यात आली. पहिल्याच महिन्यात वापर नसताना ७ लाख रूपये वीज बिल आले होते. फेब्रुवारी २०१४ पासून प्रत्यक्ष मुख्यालय सुरू झाले व वीज बिलांचा आकडा फुगतच गेला. एप्रिल २०१४ मध्ये ३० लाख ३५ हजार रूपये बिल भरावे लागले होते. तो विक्रम जून २०१६ मध्ये मोडीत निघाला व विक्रमी ३६ लाख रूपये बिल भरावे लागले होते. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याला २५ ते ३५ लाख रूपये खर्च करावे लागत असून देशातील कोणत्याही सरकारी कार्यालयांपेक्षा जास्त विजेचा वापर नवी मुंबई महापालिका करत आहे. सर्वसामान्य नवी मुंबईकरांनी कररूपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी सुरू असून ती थांबविण्याची मागणी केली जात आहे.