शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

आदिवासींच्या घरांवर चालविला बुलडोझर, सरकारी यंत्रणेकडूनच लाभार्थींच्या डोक्यावरील छत हिसकावण्याचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:46 IST

‘आम्ही लाभार्थी’, ‘आमचे सरकार’च्या जाहिराती करणाºया भाजपा सरकारच्या काळात पनवेलमधील आदिवासींना बेघर करण्याचे षड्यंत्र सुरू आहे.

नामदेव मोेरे, वैभव गायकर पनवेल : ‘आम्ही लाभार्थी’, ‘आमचे सरकार’च्या जाहिराती करणाºया भाजपा सरकारच्या काळात पनवेलमधील आदिवासींना बेघर करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पनवेल शहरातील पुराणिक आदिवासीवाडीतील नऊ कुटुंबीयांची घरे अनधिकृत ठरवून त्यावर बुलडोझर फिरविण्यात आला आहे. आदिवासींना हक्काची घरे देण्याऐवजी त्यांचा निवारा हिसकावण्यात आला असून, ‘आम्हाला न्याय कधी मिळणार?’ असा प्रश्न येथील रहिवासी विचारू लागले आहेत.नवीन पनवेल येथील सर्वे क्रमांक १६७ व १६१वर पुराणिक आदिवासीवाडी वसली आहे. जमिनीचे मालक गंगाधर विष्णू पराणिक यांच्याकडे आदिवासी नागरिक काम करत होते. त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी घरे देण्यात आली होती. जवळपास १९७०च्या पूर्वीपासूनच आदिवासी या जमिनीवर भातशेती करत आहेत. घुटे, घुमने व दोरे अशी एकूण नऊ आदिवासी कुटुंबे येथे वास्तव्य करत आहेत. सिडकोने या सर्वांना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर ६ जून २०१७ रोजी कारवाई केली आहे. आदिवासींना त्यांचे पुरावे सादर करण्याची संधी न देता, या घरांवर बुलडोझर चालविण्यात आला. वास्तविक पावसाळ्यात अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, असे संकेत आहेत; परंतु ते सर्व संकेत पायदळी तुडवून आदिवासींना बेघर करण्यात आले. आदिवासी कुटुंबांना कित्येक दिवस पावसात भिजावे लागले होते. पूर्ण संसारच उघड्यावर आला. आदिवासी नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असून, ‘आम्हाला न्याय मिळावा,’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सिडकोने व शासन यंत्रणेने केलेल्या अन्यायाविषयी माहिती देताना येथील आदिवासी नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत. ‘आमचे अश्रू कोण पुसणार? आम्हाला आमचा हक्क कधी मिळणार?’ असे प्रश्न रहिवासी विचारत आहेत.पुराणिकवाडीमधील आदिवासींनी पुन्हा त्याच ठिकाणी झोपडीवजा घरे बांधली आहेत; परंतु या झोपड्यांमध्ये वीज नाही. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया पनवेल महापालिकेच्या कार्यक्षेत्रामधील आदिवासी अंधारात जीवन जगत आहेत. या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसून, कोणत्याच अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. आदिवासी नागरिकांनी वस्तीच्या बाजूला सातआसरा देवीचे मंदिर उभारले होते. आदिवासींचे मंदिरही सिडकोने हटविले आहे. आमच्या देवाचेही अस्तित्व नाकारल्यांची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे.‘आम्ही अतिक्रमण केलेले नाही. आमच्या कित्येक पिढ्या याच ठिकाणी वास्तव्याला होत्या. आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळवून द्यावे,’ अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.>आम्ही अनेक पिढ्यांपासून येथे वास्तव्य करत आहोत. सिडकोने आमची जुने घरे तोडून आम्हाला बेघर केले आहे. आम्हाला न्याय मिळावा व आहे त्याच जमिनीवर आमचे पुनर्वसन व्हावे, एवढीच अपेक्षा आहे.- पदू हिरू दोरे,रहिवासी>आदिवासींची ९ कुटुंबे याठिकाणी कित्येक वर्षांपासून राहात आहेत. आमची घरे जूनमध्ये तोडल्यामुळे आम्हाला पावसात राहावे लागले होते. देवाचे मंदिरही तोडण्यात आले. आम्हाला न्याय मिळावा व हक्काचे घर आहे त्याच ठिकाणी मिळावे, अशी आमची मागणी आहे.- शमा घुटे