शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

खाडीपुलावर सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 03:06 IST

देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत. मात्र, जरी अधिकाराची खांदेपालट झाली असली, तरीही तिथल्या समस्या मात्र जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, त्या ठिकाणी वाहतूककोंडीसह अपघातांच्या घटना घडत असून पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी येथील खाडीपुलाच्या देखभाल दुरुस्तीचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. यादरम्यान पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली होती, त्यामुळे रात्रीच्या वेळी खाडीपुलावर अपघातांच्या घटना घडत होत्या. तर टोलनाका परिसरात व पुलावर सातत्याने खड्डेही पडत होते, यामुळे होणारी वाहतूककोंडी ही प्रवाशांसह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत होती. तर अशाच प्रकारातून वर्षभरापूर्वी घडलेल्या एका अपघातप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात सातत्याने होणाºया तक्रारींमुळे शासनाने वाशी टोलनाक्याच्या देखभाल दुरुस्तीच्या अधिकारात खांदेपालट केली आहे. त्यानुसार मागील पाच महिन्यांपासून या पुलावरील सिव्हिल व विद्युत दोन्ही कामांचे अधिकार पीडब्ल्यूडी कडून एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आले आहेत, यामुळे खाडीपुलावरील समस्या संपुष्टात निघतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.प्रत्यक्षात मात्र सदर मार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत, त्यामुळे ‘पुलाचे कारभारी बदलले तरीही कारभार मात्र जसाच्या तसाच’ असल्याची टीका होऊ लागली आहे.खाडीपुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची कमी असल्याने त्यावरून आत्महत्येचे प्रकार घडत आहेत, तर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून त्या ठिकाणी वाहनांची गती मंदावून वाहतूककोंडी होत आहे. त्यापैकी मुंबईकडे जाणाºया मार्गावर अधिक खड्डे असल्याने अनेकदा सकाळच्या वेळी खाडीपुलापासून ते वाशीगावापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. तर पुलावरील पथदिवे केवळ नावालाच असल्याने, रात्रीच्या वेळी पुलावर पुरेसा प्रकाश नसल्याने वाहन चालवताना चालकांचीही कसोटी लागत आहे. त्यामुळे खाडीपुलावर भेडसावणाºया समस्यांचा राग वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांवर निघत आहे. अनेकदा टोलनाक्यालगत वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर कारवाईची मोहीम राबवली जाते. त्या वेळी चालकांकडून खाडीपुलावरील खड्डे, पथदिवे तसेच टोलनाक्यालगतच्या रस्त्यावरील खड्डे अशा अनेक समस्यांचा पाढा वाचला जात असल्याचीही वाहतूक पोलिसांची खंत आहे.तर पीडब्ल्यूडीकडे देखभाल दुरुस्तीचे अधिकार असताना किमान तक्रारीनंतर तरी खड्डे बुजवले जायचे असे वाहतूक पोलिसांसह प्रवाशांचे म्हणणे आहे.वाहतूक पोलिसांकडूनही वेळोवेळी संबंधित अधिकाºयांना कळवण्यात आले आहे. मात्र,मागील पाच महिन्यांत पूर्णपणे पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचा संताप व्यक्त होत आहे. त्यानंतरही पुलावरील गैरसोयी दूर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक अनिलकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.अपघाताची शक्यतापुलाच्या वाशीकडे येणाºया मार्गिकेवर उतारालाच दोन टप्प्याच्या कामात फट निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी कार अथवा दुचाकीचा टायर घासून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये जीवितहानीही होऊ शकते. त्यानंतरही डांबरीकरण व काँक्रीटीकरण यामध्ये तयार झालेली तेथील फट बुजवण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.पथदिवे गायबखाडीपुलावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश पडावा, याकरिता पथदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, अधिकतम वेळा पथदिवे बंद असतात. सध्याही बºयाच कालावधीपासून तिथले पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणचे खांबही नाहीसे झाले आहेत. यावरून खाडीपुलावरील पथदिव्यांच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर याच कारणावरून पीडब्ल्यूडीकडून हा पूल रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आला. मात्र, त्यानंतरही समस्या जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने हस्तांतरामागचे नेमके कारण गुलदस्त्यातच असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई