शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

आगरी-कोळी समाजाच्या कर्तृत्वाला मिळतोय उजाळा

By admin | Updated: January 5, 2017 06:28 IST

आगरी-कोळी समाजाला अभिमानास्पद पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबईसह कोकणचे आद्य भूमिपुत्र असणाऱ्या या समाजाने शिवरायांच्या आरमाराची धुरा समर्थपणे सांभाळली

नवी मुंबई : आगरी-कोळी समाजाला अभिमानास्पद पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबईसह कोकणचे आद्य भूमिपुत्र असणाऱ्या या समाजाने शिवरायांच्या आरमाराची धुरा समर्थपणे सांभाळली. खोती विरोधी आंदोलनापासून ते प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यांची देशपातळीवर दखल घेतली. नवी मुंबईमधील भूमिपुत्र, हा इतिहास घराघरांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी प्रदर्शनासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मूळ भूमिपुत्र म्हणून आगरी कोळी समाजाची इतिहासामध्ये नोंद आहे. कष्टकरी, स्वाभिमानी व लढाऊ म्हणून आगरी कोळी नागरिक ओळखले जातात. देशाला मीठ पुरविणाऱ्या या भूमिपुत्रांनी मासे व मिठाची निर्यात करून विदेशी व्यापारास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यानंतर त्याची धुराही येथील भूमिपुत्रांनीच सांभाळली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर वंचितांच्या हक्कासाठी येथील नागरिकांनी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. २७ आॅक्टोबर १९३३ मध्ये चरी कोपर येथे शेतकऱ्यांनी केलेला संप तब्बल सहा वर्षे सुरू होता. या संपामुळे खोती पद्धत नष्ट होऊन कुळ कायदा अस्तित्वात आला. इंग्रजांनी जंगल कायदा लागू केल्यानंतर देशभर आंदोलन सुरू झाले. उरणमधील चिरणेर गावात झालेल्या आंदोलनामध्ये येथील भूमिपुत्रांचे रक्त सांडले. देशातील सर्वात तीव्र आंदोलन म्हणून चिरनेरचा उल्लेख केला जातो. घणसोलीमधील स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरोधात दिलेल्या लढ्याची दखलही इतिहासामध्ये घेण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी लढणारा शेतकरी कामगार पक्षही याच भूमीत वाढला व टिकून राहिला आहे. देशातील प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला नवीन दिशा देण्याचे काम येथील आगरी-कोळी नागरिकांनी केले आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने जमीन संपादित केल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारण्यात आले. जासईजवळील दास्तानफाट्यावर झालेल्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी रक्त सांडले. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उभारलेल्या आंदोलनाची दखल केंद्र शासनाला घ्यावी लागली. (प्रतिनिधी)