शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

आगरी-कोळी समाजाच्या कर्तृत्वाला मिळतोय उजाळा

By admin | Updated: January 5, 2017 06:28 IST

आगरी-कोळी समाजाला अभिमानास्पद पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबईसह कोकणचे आद्य भूमिपुत्र असणाऱ्या या समाजाने शिवरायांच्या आरमाराची धुरा समर्थपणे सांभाळली

नवी मुंबई : आगरी-कोळी समाजाला अभिमानास्पद पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबईसह कोकणचे आद्य भूमिपुत्र असणाऱ्या या समाजाने शिवरायांच्या आरमाराची धुरा समर्थपणे सांभाळली. खोती विरोधी आंदोलनापासून ते प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यांची देशपातळीवर दखल घेतली. नवी मुंबईमधील भूमिपुत्र, हा इतिहास घराघरांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी प्रदर्शनासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मूळ भूमिपुत्र म्हणून आगरी कोळी समाजाची इतिहासामध्ये नोंद आहे. कष्टकरी, स्वाभिमानी व लढाऊ म्हणून आगरी कोळी नागरिक ओळखले जातात. देशाला मीठ पुरविणाऱ्या या भूमिपुत्रांनी मासे व मिठाची निर्यात करून विदेशी व्यापारास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यानंतर त्याची धुराही येथील भूमिपुत्रांनीच सांभाळली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर वंचितांच्या हक्कासाठी येथील नागरिकांनी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. २७ आॅक्टोबर १९३३ मध्ये चरी कोपर येथे शेतकऱ्यांनी केलेला संप तब्बल सहा वर्षे सुरू होता. या संपामुळे खोती पद्धत नष्ट होऊन कुळ कायदा अस्तित्वात आला. इंग्रजांनी जंगल कायदा लागू केल्यानंतर देशभर आंदोलन सुरू झाले. उरणमधील चिरणेर गावात झालेल्या आंदोलनामध्ये येथील भूमिपुत्रांचे रक्त सांडले. देशातील सर्वात तीव्र आंदोलन म्हणून चिरनेरचा उल्लेख केला जातो. घणसोलीमधील स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरोधात दिलेल्या लढ्याची दखलही इतिहासामध्ये घेण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी लढणारा शेतकरी कामगार पक्षही याच भूमीत वाढला व टिकून राहिला आहे. देशातील प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला नवीन दिशा देण्याचे काम येथील आगरी-कोळी नागरिकांनी केले आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने जमीन संपादित केल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारण्यात आले. जासईजवळील दास्तानफाट्यावर झालेल्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी रक्त सांडले. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने साडेबारा टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उभारलेल्या आंदोलनाची दखल केंद्र शासनाला घ्यावी लागली. (प्रतिनिधी)