शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:42 IST

उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यामुळे पुलांवरून दररोज शेकडो वाहनांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, तर गतवर्षात याच पुलावर सर्वाधिक गंभीर अपघात घडलेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराकडून परिस्थितीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.सायन-पनवेल मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्यात उरण फाटा येथील पुलाचाही समावेश आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणारी वाहने व जेएनपीटीकडे जाणारे कंटेनर यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व्हायची. शिवाय अपघातांच्या घटना देखील त्याठिकाणी घडत होत्या. यामुळे त्याठिकाणी हा उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. मात्र पुलाचे काम झाल्यापासूनच त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग त्याठिकाणी घडत आहेत. गतवर्षी पुलावर डांबरीकरणात झालेल्या निष्काळजीमुळे वाहनांच्या अपघाताची मालिका सुरू होती. त्यात एकाचा प्राण देखील गेला असून याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. त्यानंतरही या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही वर्षातच या पुलाच्या सुरक्षा कठड्याला जागोजागी तडे गेले आहेत. सीबीडीकडून वाशीकडे येणाºया मार्गाच्या कठड्यावर हे तडे सर्वाधिक दिसून येत आहेत. तडे गेल्याने सुरक्षा कठड्याचे वेगवेगळे भाग झाले असून, ते देखील कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. अशावेळी एखाद्या जड वाहनाचा अपघात होवून त्याची पुलाच्या कठड्याला धडक बसल्यास ते वाहन कठड्यासह खाली कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.पुलावरील त्याच मार्गाच्या उतारापूर्वी काही अंतर अगोदर सुरक्षा कठड्याचा मोठा भाग कोसळलेला आहे. कठड्याचा हा भाग मागील पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून त्याच ठिकाणी ठेवलेला आहे. यामुळे पुलावरून उतरत असलेले एखादे भरधाव वाहन त्याठिकाणी पुलावरून खाली कोसळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अशातच भर पावसात पुलावरून पाण्याचे पाट वाहत आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पुलाच्या कडेला ठरावीक अंतरावर होल करण्यात आले आहेत. मात्र पाण्यासोबत वाहत आलेला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा त्यात अडकल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे पुलावरील पाण्याचा निचरा होत नसून ते पुलावरूनच उताराच्या दिशेने वाहत आहे. यामुळे अगोदरच निसरडा असलेल्या पुलावरून वाहणाºया पाण्यामुळे भरधाव वेगाने धावणाºया वाहनांसाठी अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पुलावरील या दुरवस्थेचे उघड दर्शन घडत असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजिक बांधकाम विभागासह ठेकेदाराचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु त्यांचा हा निष्काळजीपणा भविष्यात दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे पुलावरून ये-जा करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.>कठड्याची उंची धोकादायकउरण फाट्यावरील पुलासह सायन-पनवेल मार्गावरील इतरही पुलांच्या सुरक्षा कठड्याच्या उंचीमुळे देखील अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. कठड्याची उंची कमी असल्याने एखाद्या अपघातामध्ये दुचाकीस्वार अथवा जड वाहन कठड्यावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने दुचाकीस्वारांना डाव्या बाजूने जाताना कठड्यापासून काहीसे लांबूनच चालावे लागत आहे. त्यामुळे मधल्या लेनमध्ये दुचाकी आल्यास पाठीमागून येणाºया दुसºया भरधाव वाहनांची त्यांना धडक बसणार नाही याची खबरदारी बाळगावी लागत आहे.उरण फाटा येथील पुलावर डांबरीकरणावेळी झालेल्या त्रुटीमुळे रस्ता गुळगुळीत होवून अपघात घडत होते. त्याचवेळी पोलिसांनी तिथल्या परिस्थितीची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदाराला दिली होती. त्यानंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने २ जुलै २०१७ रोजी पुलावर एकापाठोपाठ अनेक वाहने घसरून घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेकेदाराने पुलावर जागोजागी आडव्या पट्ट्या मारल्या आहेत. मात्र उर्वरित जागी गतवर्षासारखीच परिस्थिती असल्याने यंदाच्या पावसाळ्यात देखील हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो.