शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फेसबुकमुळे सापडला पळालेला मुलगा; तीन वर्षांपूर्वी सोडलेले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:05 IST

दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले.

नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले. घर सोडून गेल्यानंतर तो नाशिक येथील ढाब्यावर काम करत होता.सागर भालेराव हा दहावीचा विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार जानेवारी २०१४ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याअनुषंगाने सखोल तपास करूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सर्व पोलीस ठाणे, सोशल मीडिया यावर त्याचे छायाचित्र प्रसारित करूनही त्याच्याविषयीची कसलीच माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. अशातच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील काही वर्षांत बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलांचा नव्याने शोध घेण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान बेपत्ता असलेल्या सागर भालेराव याच्याविषयीची संशयास्पद माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार शशिकांत पाटील, विकास जाधव यांंच्या पथकाने तपासाला सुुरवात केली होती. सागर याच्या आतेभावासोबत एक तरुणी फेसबुकवर चॅटिंग करत होती. मात्र सदर तरुणीबाबत त्याला संशय होता. यामुळे त्याने सदर बाब पोलिसांंना सांगितली होती. यामुळे फेसबुकवरील सदर खात्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न झाला असता, त्याचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप तपासला असता सागरच्या चेहरापट्टीशी मिळताजुळता चेहरा असल्याचे समोर आले. शिवात तो नाशिकमधील उमराणे गावात ढाब्यावर नोकरीला असल्याचेही तपासात उघड झाले. यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या तपास पथकाने सागरच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना घेवून सदर ठिकाणी गेले. यावेळी सागर भालेराव हा त्याठिकाणी आढळून आला. यावेळी सागर याने दहावीच्या परीक्षेच्या भीतीमुळे घर सोडल्याचे सांगितले. तर घर सोडल्यानंतर तो नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी फिरल्यानंतर सदर ठिकाणी ढाब्यावर कामाला लागला होता. फेसबुकवर खाते खोलण्यासाठी मोबाइल नंबर आवश्यक असल्यामुळे मोबाइल नंबरमुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोचले.

टॅग्स :Facebookफेसबुक