शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

फेसबुकमुळे सापडला पळालेला मुलगा; तीन वर्षांपूर्वी सोडलेले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:05 IST

दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले.

नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले. घर सोडून गेल्यानंतर तो नाशिक येथील ढाब्यावर काम करत होता.सागर भालेराव हा दहावीचा विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार जानेवारी २०१४ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याअनुषंगाने सखोल तपास करूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सर्व पोलीस ठाणे, सोशल मीडिया यावर त्याचे छायाचित्र प्रसारित करूनही त्याच्याविषयीची कसलीच माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. अशातच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील काही वर्षांत बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलांचा नव्याने शोध घेण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान बेपत्ता असलेल्या सागर भालेराव याच्याविषयीची संशयास्पद माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार शशिकांत पाटील, विकास जाधव यांंच्या पथकाने तपासाला सुुरवात केली होती. सागर याच्या आतेभावासोबत एक तरुणी फेसबुकवर चॅटिंग करत होती. मात्र सदर तरुणीबाबत त्याला संशय होता. यामुळे त्याने सदर बाब पोलिसांंना सांगितली होती. यामुळे फेसबुकवरील सदर खात्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न झाला असता, त्याचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप तपासला असता सागरच्या चेहरापट्टीशी मिळताजुळता चेहरा असल्याचे समोर आले. शिवात तो नाशिकमधील उमराणे गावात ढाब्यावर नोकरीला असल्याचेही तपासात उघड झाले. यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या तपास पथकाने सागरच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना घेवून सदर ठिकाणी गेले. यावेळी सागर भालेराव हा त्याठिकाणी आढळून आला. यावेळी सागर याने दहावीच्या परीक्षेच्या भीतीमुळे घर सोडल्याचे सांगितले. तर घर सोडल्यानंतर तो नोकरीच्या शोधात अनेक ठिकाणी फिरल्यानंतर सदर ठिकाणी ढाब्यावर कामाला लागला होता. फेसबुकवर खाते खोलण्यासाठी मोबाइल नंबर आवश्यक असल्यामुळे मोबाइल नंबरमुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोचले.

टॅग्स :Facebookफेसबुक