शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

मुंबई ऊर्जा कंपनीने लावला ‘नैना’ला सुरुंग; आराखड्यातील भूखंडांमधूनच वीजवाहिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 05:41 IST

सिडकोची मेहनत वाया जाणार, शेतकऱ्यांत तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सिडको महामंडळाने तब्बल ११ वर्षे प्रचंड मेहनत घेऊन नैना प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून त्याच्या कामास आता कुठे सुरुवात केली आहे. मात्र, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी नैनासाठी देऊन सिडकोस सहकार्य केले आहे, तेही आता मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीच्या अडवणुकीमुळे अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना सिडकोने तयार केलेल्या विकास आराखड्यातील भूखंडामधूनच मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने आपल्या वीजवाहिनीचा मार्ग निवडल्याने नैना पुढील संकटे आणि सिडकोची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीच्या अडेलतट्टू भूमिकेला लगाम लावला नाही तर स्थानिक आणि शेतकरीही आंदोलनात उतरतील व त्यात सरकारला निष्कारण वाईटपणा येऊ शकतो, असे सिडकोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नैनाच्या परिघात सिडकोने ज्या टीपी स्कीम तयार केल्या आहेत, त्यातील नेवाळी परिसरातले शेतकरीही नैनात सहभागी झाले आहेत. त्यांना सिडकोने जे भूखंड आखून दिले त्याच भूखंडातून मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने आपली वीजवाहिनी टाकण्याचा नियमबाह्य निर्णय घेतला असून त्यासाठीच्या नोटिसा उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना बजावल्या आहेत. ऊर्जा कंपनीचे हे काम सिडकोलाही मान्य नसल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.

आम्ही नुकसान सोसून आमच्या १०० टक्के जमिनी देऊन सिडकोकडून अवघ्या ४० टक्के जमिनी घेतल्या. यानंतर सिडकोने जनसुनावणी घेतली. या सुनावणीत मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीचेही म्हणणे ऐकून त्यांनी सुचविल्यानुसारच आपल्या टीपी स्कीममधील भूखंडाची रचना, रस्ते, पायवाटा टाकल्या. यासाठी सिडको अधिकाऱ्यांनी ११ वर्षे दिवसरात्र मेहनत घेतली. असे असतानाही आता मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने कोणालाही विचारात न घेता आपल्या वीजवाहिन्यांच्या मूळ मार्गात बदल करून मनमानीपणे शेतकऱ्यांना आखून दिलेल्या भूखंडामधून ती टाकण्याचा निर्णय घेऊन सिडकोच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. यामुळे मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीविरोधात सिडकोसह या शेतकऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. 

  • आम्ही जमिनी देऊन आधीच ६० टक्के नुकसान सोसले आहे. आता पुन्हा मुंबई ऊर्जा प्रकल्पासाठी ते का सोसायचे, असा प्रश्न या बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे नेवाळीप्रमाणेच खारघर, ओवे, मुर्बी परिसरातही मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने अशी मनमानी केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या विरोधामुळे वीजवाहिनी टाकण्याचे काम सध्या थांबले आहे.
  • सिडकोच्या नगररचना अधिकाऱ्यांची याबाबतची भूमिका स्पष्ट आहे. लोकमतशी बोलताना ते म्हणाले, मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीने जनसुनावणीत सांगितल्यानंतरच आम्ही रस्ते, पदपथासह वीजवाहिनी मार्ग आणि भूखंडाचे आरक्षण टाकले आहे. आता ते परस्पर सिडकोत विचारात न घेता वीजवाहिनीचा मार्ग बदलू शकत नाहीत. बदललेल्या मार्गाबाबत त्यांनी सिडकोस विचारात घेतलेले नाही.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार आम्ही स्थानिक शेतकरी, प्रांताधिकारी यांच्यासमवेत सामूहिक पाहणी दौरा केला. या पाहणीत स्थानिकांनी ११ टॉवरचे मार्ग बदलण्याची सूचना केली होती. १६ पैकी १० टॉवर एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या परवानगीअभावी फेल होत आहेत. त्यामुळे एकाही टॉवरचा मार्ग बदलता येणे अशक्य आहे. तशा प्रकाराचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला आहे. यापूर्वी शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार नैना क्षेत्रातील मार्गात आम्ही काही बदल केला आहे.- निनाद पितळे (प्रकल्प अधिकारी, मुंबई ऊर्जा मार्ग कंपनी)

सिडकोने मुंबई ऊर्जाचे म्हणणे ऐकल्यानंतर टीपीएस ४ चा आराखडा तयार केला आहे. यामुळे त्यांनी टीपीएस ४ मधील शेतकऱ्यांच्या भूखंडांसह सिडकोने सामाजिक सुविधांसाठी आरक्षित ठेवलेले भूखंड आणि महसूल मिळविण्यासाठी विक्रीस ठेवलेल्या मोकळ्या जागा, रस्ते बाधित होणार नाहीत याची काळजी घेऊनच आपली वीजवाहिनी टाकावी. याच अटीवर मुंबई ऊर्जा मार्ग कंपनीस सिडकोने आपले ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यानुसारच काम करणे बंधनकारक असून सध्या ते जे काम करीत आहेत, ते सिडकोच्या नियमानुसार नाही.- मोहन निनावे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, नैना प्रकल्प सिडको.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईelectricityवीजcidcoसिडको