शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

बोगस डॉक्टरांना रायगडमध्ये आश्रय!

By admin | Updated: January 29, 2017 02:26 IST

रायगड जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नाही. यामुळे वैद्यकीय पदवी नसतानाही अनेक तोतया डॉक्टर शहरांसह ग्रामीण भागात वर्षानुवर्षे

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नाही. यामुळे वैद्यकीय पदवी नसतानाही अनेक तोतया डॉक्टर शहरांसह ग्रामीण भागात वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील २४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई व इतर महानगरपालिकांमध्येही व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांची नोंदणी केली जाते. त्यांची कागदपत्रे तपासण्यात येत असल्याने बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे पडते. पण रायगड जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच सक्षम यंत्रणा नाही. जिल्ह्याचे क्षेत्रफळ तब्बल ७१४८ हेक्टर असून लोकसंख्या २२ लाखपेक्षा जास्त झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ५२ आरोग्य केंद्रे व २८८ उपकेंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. १९१९ गावे व ८२१ ग्रामपंचायतींपर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यात अपयश येवू लागले आहे. यामुळे नागरिकांना खासगी डॉक्टरकडून उपचार करून घेण्यापेक्षा दुसरा पर्याय शिल्लक नाही. चांगले डॉक्टर छोट्या शहरात व ग्रामीण भागात जाण्यास इच्छुक नसतात. याचा गैरफायदा घेवून बोगस डॉक्टर परिसरात व्यवसाय करीत आहे. यापूर्वी पेणमध्ये बोगस एम. डी. डॉक्टरवर कारवाई करण्यात आली होती. पण बोगस डॉक्टरांची संख्या व होणारी कारवाई यामध्ये मोठी तफावत आहे. शासकीय स्तरावरही बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. महापालिका क्षेत्रात नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्यात येते. आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये छोटा दवाखाना सुरू केला तरी त्याची माहिती पालिकेला देणे बंधनकारक असते. वैद्यकीय पदवी व इतर आवश्यक तपशील पुरविल्यानंतर आरोग्य विभागाच्या समितीच्यावतीने कागदपत्रांची छाननी केली जाते. एखाद्याच्या कागदपत्रामध्ये संशयास्पद वाटल्यास मेडिकल कौन्सिलकडून अधिक माहिती घेतली जाते. नवी मुंबईमध्ये गुन्हे दाखल केल्यानंतरही काही बोगस डॉक्टर पुन्हा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे दवाखाने सील करण्यात आले आहेत. याच धर्तीवर रायगड परिसरात विशेष मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे. पेणमधील धुमाळच्या दोन चित्रफिती उपलब्ध पहिल्या चित्रफितीमध्ये मधुमेह झालेल्याचा डॉक्टरशी संवाद आहे. यामध्ये मधुमेह असला तरी आम्ही किडनी स्टोनच्या आजारावर उपचार करतो. त्यासाठी मधुमेहाची वेगळी औषधे देतो. मगाशी आलेली ती बाई तिलाही मधुमेह आहे. आम्ही तिच्यावर यशस्वी उपचार केल्याचे विश्वास धुमाळ सांगताना दिसत आहे. दुसऱ्या १२ मिनिटांच्या चित्रफितीमध्ये रुग्णाशी उपचार घेताना झालेला संवाद आहे. यावेळी रुग्णास तपासण्याबरोबर त्याला इंजेक्शन देताना व कोणती पथ्ये पाळायची, कशी औषधे घ्यायची याविषयीचा तपशील दिसत आहे. या दोन्ही चित्रफिती जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्या पाहून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार दीपक दांडेकर यांनी केली आहे. रजिस्टर नंबर बंधनकारक करावा प्रत्येक डॉक्टरने रुग्णालयातील दर्शनी भागात त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. पण अनेक डॉक्टर असे प्रमाणपत्र लावत नाहीत. याशिवाय रुग्णालयाच्या पाटीवर वैद्यकीय पदवीसोबत रजिस्टर नंबर लिहिणे बंधनकारक करण्यात यावे. यामुळे नागरिकांना डॉक्टर बोगस आहे का हे तपासणे सोपे होवू शकते. विशेष सर्वेक्षणाची गरज रायगड जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह महसूल विभागाने थेट ग्रामसेवकांचीही मदत करून प्रत्येक गावातील व शहरातील डॉक्टरांचा तपशील संकलित करावा. जिल्ह्यात ओपीडी सुरू करण्यासाठीही परवानगी घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी कार्यरत आहे. एखाद्या डॉक्टरविषयी तक्रार आल्यास त्या कमिटीकडे पाठविली जाते. संबंधितांच्या कागदपत्रांची छाननी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाते. नागरिकांना कुठेही बोगस डॉक्टर आढळला तर त्यांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात तक्रार करावी. - डॉ. सचिन देसाई, आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद