शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे, सुमारे १०० घरांना तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 19:18 IST

मधुकर ठाकूर  उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपासारखे हादरे बसत ...

मधुकर ठाकूर 

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत.यामुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बोर ब्लास्टींग बंद न केल्यास विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा कडक इशारा वहाळ ग्रामपंचायतीने  सिडकोला दिला आहे. 

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सपाटीकरणाचे जोरदार काम सुरू आहे.डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी बोर ब्लास्टींगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.यासाठी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे ठेकेदार अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.मात्र दररोज दुपारच्या वेळी बोर ब्लास्टींग करताना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक स्फोटाकांच्या प्रमाणाचा वापर मेसर्स. अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीकडून केला जात आहे.

दररोज विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सर्वच रहिवाशांच्या घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसू लागले आहेत.एखाद्या भुकंपाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे  ३०० घरांपैकी सुमारे १०० घरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य घरत यांनी दिली.

वहाळ गावातील रहिवासी केसरीनाथ दापोळकर यांच्या आरसीसी घराच्या कॉलमला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.घरातील तीनही भिंतीनाही तडे गेले असल्याने सातत्याने जीवमुठीत धरुनच घरात राहावे लागत आहे.मात्र भीतीमुळे लहान मुलांना दुसऱ्या घरी पाठविण्यात आले असल्याची माहिती केसरीनाथ दापोळकर यांनी दिली. तर आशाबाई दापोळकर या विधवा महिलेच्या घरातील घर,जीना,लाद्या,सिलिंगला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. आर्थिक ओढाताण करून बांधलेल्या एकमेव घरात दोन मुलांसह राहते.

दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे वित्त, जिवितहानी होण्याच्या भीतीने घरात नाईलाजाने वास्तव्य करून राहतात असल्याची खंतही आशाबाईंनी व्यक्त केली आहे.बोर ब्लास्टींगच्या जबरदस्त हादऱ्यामुळे संपुर्ण घरच कमकुवत बनल्याने घर राहाण्यास धोकादायक बनले असल्याची व्यथा दामोदर धावजी पाटील यांनी मांडली.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे बसत आहेत.अनेक घरांना तडेही गेले आहेत. यामुळे वित्त व जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून बोर ब्लास्टींग बंद करण्यात यावे अन्यथा विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पुजा पाटील यांनी दिली.

बाब गंभीर असल्याने या बोर ब्लास्टींगची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सुचना दिल्या असल्याची माहिती प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईAirportविमानतळ