शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

महापौरांसह सहा नगरसेवकांचा तूर्तास भाजपप्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:56 IST

निवडणूक टाळण्यासाठी निर्णय : ४८ नगरसेवक भाजपमध्ये दाखल

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक समर्थक ४८ नगरसेवकांनी वेगळा गट तयार करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. महापौर, स्थायी समिती सदस्यांसह एकूण सहा समर्थक नगरसेवक राष्ट्रवादी काँगे्रसमध्येच राहणार आहेत. महापौरपदाची निवडणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाईक परिवार भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असे बोलले जात होते. महापौरांसह नाईक समर्थक ५५ नगरसेवक वेगळा गट तयार करणार, असे बोलले जात होते. सोमवार, ९ सप्टेंबरला नगरसेवक कोकण भवनमध्ये जाऊन वेगळा गट करण्याचे निवेदन दिले जाणार होते; परंतु सर्व नगरसेवकांच्या सह्या न मिळाल्यामुळे निवेदन दिले नाही. कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याचे कारण देण्यात आले होते. पुढील २४ तास सर्व नगरसेवकांच्यासह्या मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. कायदेशीर अडचणींची माहितीही घेतली जात होती. महापौरांसह सर्व नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास महापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती. यामुळे महापौर जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती नवीन गवते, जयश्री ठाकूर, लीलाधर नाईक, उषा भोईर व लता मढवी यांना राष्ट्रवादीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर, स्थायी समिती सभापतीसह सहा नगरसेवक वगळता उर्वरित ४८ नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे गटनेते रामचंद्र घरत यांना देण्यात आले आहे. सभागृहनेते रवींद्र इथापे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यापुढे घरत हेच या सर्व नगरसेवकांचे गटनेते राहणार आहेत. यामुळे आता महानगरपालिकेमध्ये महापौर नाईक समर्थक असला तरी त्यांचा पक्ष राष्ट्रवादीच राहणार आहे. याविषयी राष्ट्रवादी काँगे्रस नक्की काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.

नगरसेवकपद रद्द करण्यासाठी अर्ज करणार१) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अशोक गावडे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नियमाप्रमाणे ठरावीक नगरसेवकांना वेगळा गट तयार करता येत नाही. तांत्रिक अडचणी लक्षात आल्यामुळे महापौरांसह सहा जणांनी भाजपमध्ये प्रवेश करणे टाळले आहे. ज्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे किंवा वेगळा गट केल्याचा दावा केला आहे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी आम्ही तत्काळ केली आहे. नाईकांनी स्वार्थासाठी या नगरसेवकांचा बळी घेतल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याविषयी कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप पालिकेत सर्वात मोठा पक्ष२) नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून कोणत्याच निवडणुकीमध्ये भाजपला प्रभाव पाडता आला नाही. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये एकही नगरसेवक निवडून आला नाही. २००५ च्या निवडणुकीमध्ये भरत जाधव हे एकमेव उमेदवार निवडून आले. २०१० च्या निवडणुकीमध्ये पुन्हा विजया घरत या एकमेव नगरसेविका निवडून आल्या. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले. गणेश नाईक समर्थक ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता भाजपचे सभागृहातील संख्याबळ ५४ एवढे होणार आहे. भाजप पहिल्यांदा महापालिकेमधील सर्वात मोठा पक्ष झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस