शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

भूसुरुंगामुळे उलवे परिसर हादरला; विमानतळाच्या कामाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 06:15 IST

विमानतळ परिसरातील टेकडी सपाटीकरणासाठी लावलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील घरांवर दगडांचा वर्षाव झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

पनवेल : विमानतळ परिसरातील टेकडी सपाटीकरणासाठी लावलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील घरांवर दगडांचा वर्षाव झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन याविषयी जाब विचारला.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीसाठी उलवे येथील टेकडीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. ९० मीटर उंची असलेली टेकडीची उंची कमी करून ९ मीटर करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १३०० स्फोट घडविले जाणार आहेत. रोज दुपारी पावणेदोन ते दोन वाजण्याच्या सुमारास ब्लास्टिंग केले जाते. ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांवर दगड पडणे व नुकसान होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. सोमवारी दुपारी सपाटीकरणासाठी केलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील जवळपास १५ घरांवर दगड पडले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.दगड पडले तेव्हा शाळा सुरू होती, परंतु सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेमुळे संतापलेल्या शेकडो नागरिकांनी काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढला. नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी जावून नागरिकांना शांत केले. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेचे वृत्त समजल्यानंतर पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. शाळेवर व घरावर पडलेल्या दगडांविषयी पंचनामा केला आहे. याविषयी अहवाल सिडकोला देण्यात येणार आहे.या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करण्याचे काम सुरू होते. विमानतळ परिसरामध्ये यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर दगडांमुळे मोठी जीवित व वित्त हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशी स्थिती राहिली तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.घराला पडलेहोते भगदाडयापूर्वी वरचे ओवळे गावातील विलास घरत यांच्या घरावर ब्लास्टिंगचा दगड पडल्याने छताला व भिंतीला भगदाड पडले होते. यानंतर जूनमध्येही ओवळे गावातील गोमूबाई लांगी यांच्या घरावर दगड पडल्याने घराचे छप्पर कोसळले होते. या दोन्ही घटनांच्या नंतर प्रशासनाने घरांवर पडलेले दगड ब्लास्टिंगचे नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पुन्हा घरांवर दगड कोसळण्याच्या घटना घडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.माहिती घेण्यात येणारउलवे येथील घटनेविषयी सिडको प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातंबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या घटनेविषयी माहिती घेण्यात येणार आहे. सविस्तर माहिती घेतल्यानंतर माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठेकेदारावर गुन्हा दाखलनिष्काळजीपणा करणाºया ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याप्रकरणी वरचे ओवळे येथील दीपक घरत यांनी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी जीव्हीके कंपनीने नेमलेल्या उपठेकेदाराच्या विरोधात प्रमाणापेक्षा ब्लास्टिंग करून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.उलवे टेकडी सपाटीकरण करणाºया ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गावातील घरांचे व शाळेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व नुकसान झालेल्या ग्रामस्थांना भरपाई देण्यात यावी.- पुंडलिक म्हात्रे,ग्रामस्थ, उलवे

या घटनेचे वृत्त समजल्यानंतर आम्ही घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. छपरावर दगड पडल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी पंचनामा करण्यात आला असून याविषयी अहवाल सिडको प्रशासनाला देण्यात येणार आहे.- दीपक आकडे,तहसीलदार, पनवेल

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई